शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बंधाऱ्यांची ‘क्रॉस चेकींग’ करणार : विनायक राऊत

By admin | Updated: November 28, 2014 23:55 IST

जिल्हा परिषद दक्षता समिती सभा : पेयजल योजनेवर आक्षेप; राज्य कृषी विभागाचे धाबे दणाणले

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी करण्यात आलेली कोट्यवधींची कामे, योजनेचे निकष, राबविण्यात आलेली कामे याचा योग्य ताळमेळ जुळत नसल्याने तसेच या योजनेंतर्गत निधीचा दुरूपयोग झाला असल्याचे दिसून येत असल्याने या योजनेची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत खास समिती नेमून चौकशी करावी, असे आदेश खासदार विनायक राऊत यांनी दिले. तसेच पाणलोटअंतर्गत कोट्यवधी रूपयांची कामे होऊनदेखील पाण्याची पातळी वाढलेली नाही. त्यामुळे या सर्व बंधाऱ्यांची क्रॉस चेकींग केली जाणार असल्याची माहिती राऊत यांनी जिल्हा दक्षता व सनियंत्रण समिती सभेत दिली. दरम्यान, या योजनेवर आक्षेप घेतल्याने राज्य कृषी विभागाचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा त्रैमासिक दक्षता व सनियंत्रण समितीची सभा शुक्रवारी येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, सर्व पंचायत समिती सभापती, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची त्रैमासिक सभा पावणेदोन वर्षानंतर प्रथमच नवनिर्वाचित खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. विविध योजना व मुद्यांवर सविस्तर चर्चा होऊन आजची सभा अत्यंत खेळीमेळीत पार पडली.
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधींची कामे होतात. जिल्ह्यात ही योजना राबविताना काही गावामध्ये १० ते १२ वाड्या असताना त्यासाठी तब्बल ३० ते ४० विहिरी खोदण्यात आलेल्या आहेत. त्यावर नळ योजना राबविण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक विहिरीवर १५ लाखापर्यंत निधी खर्च करण्यात आला आहे. काही वाड्यांवर एकापेक्षा अनेक कामे आवश्यक असताना घेण्यात आल्या आहेत, असे प्रत्यक्षरित्या दिसून येत आहे. असे सांगतानाच या योजनेंतर्गत करण्यात आलेल्या निधी खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनावश्यक निधी खर्च झाला असल्याचे दिसून येत असल्याने या योजनेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी समिती नेमून चौकशी करावी, असे आदेश राऊत यांनी दिले.
पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेतला असता या योजनेवर १४९ कोटी रूपये मंजूर झाले असून त्यापैकी ३७ कोटी ६९ लाख रूपये एवढा निधी खर्च झाला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक एन. जी. वाकडे यांनी दिली. मात्र, या योजनेतील कामामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचा फायदा किती झाला, किती क्षेत्र पाण्याखाली आले, याची माहिती संबंधित अधिकारी देऊ शकला नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत आतापर्यंत झालेली कामे, बांधण्यात आलेले बंधारे यामध्ये पाणी अडविले जात नसेल तर त्याला जबाबदार कोण? या कामांवर नियंत्रण कोणाचे? असे प्रश्न उपस्थित करीत या कामात निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करीत या कामात निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला असल्याचा आरोप केला. त्यामुळे जानेवारीमध्ये या सर्व बंधाऱ्यांची पाहणी करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्य शासनाच्या कृषी विभागाचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात अद्यापही सुमारे ८०० बालके कुपोषित असून ही बाब गंभीर आहे, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. तरी कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रभावीपणे योजना राबवा, असे आदेश राऊत यांनी दिले.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे जलदगतीने होण्याच्यादृष्टीने कंत्राटी पद्धतीने शाखा अभियंता पदे नेमावीत, त्यासाठी निधीची तरतूद करावी. (प्रतिनिधी)


शासनाचे लक्ष वेधणार
आपण दिलेल्या योग्य माहितीवरच आम्ही शासनाचे लक्ष वेधणार आहोत. त्यादृष्टीने आपली माहिती तयार असली पाहिजे, असे खासदार राऊत यांनी सांगितले.