शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

खासदारांनी मच्छिमारांचीही केली दिशाभूल, परशुराम उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 4:00 PM

शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांना ते न्याय देऊ शकले नाहीत. खड्डेमय रस्त्यात आतापर्यंत २५० लोकांचा अपघाती मृत्यू व ५०० लोक जायबंदी झाले आहेत. त्याला जबाबदार सत्ताधारी, पालकमंत्री आणि खासदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केला.

ठळक मुद्देखासदारांनी मच्छिमारांचीही केली दिशाभूलपरशुराम उपरकर यांची टीका

कणकवली : मुंबई-गोवा चौपदरीकरणात असंख्य प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे खासदार विनायक राऊत यांनी दुर्लक्ष केले आहे. अनेकदा महामार्गाची पाहणी करीत बैठका घेतल्या. मात्र, शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांना ते न्याय देऊ शकले नाहीत. खड्डेमय रस्त्यात आतापर्यंत २५० लोकांचा अपघाती मृत्यू व ५०० लोक जायबंदी झाले आहेत. त्याला जबाबदार सत्ताधारी, पालकमंत्री आणि खासदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केला.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, लोकसभा निवडणूक आल्यानंतर खासदार विनायक राऊत पुन्हा आश्वासनांची खैरात करू लागले आहेत. गेल्या पाच वर्षांपूर्वी निवडणुकीत त्यांनी दिलेली आश्वासने केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना किती पूर्ण केली? त्याची विचारणा जनतेने केली पाहिजे.मोबाईल मनोऱ्यांची भूमिपूजने करून विनायक राऊत यांनी श्रेय लाटले. पण खºया अर्थाने जिल्ह्यातील दूरसंचारची लॅण्डलाईन सेवा कोलमडली आहे. त्याला श्रेय लाटणारे राऊतच जबाबदार आहेत. एका बैठकीमध्ये दूरसंचारची सुविधा न सुधारल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा खासदारांनी दिला होता. हा इशारा जनतेची दिशाभूल करणारा ठरल्याचे परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले, आरोग्याच्या प्रश्नात जिल्ह्याची दयनीय अवस्था झालेली आहे. पर्ससीन आणि पारंपरिक मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. अनेकदा मच्छिमारांना आश्वासने देऊन खासदारांनी फसवणूक करण्याचे काम केले आहे.

सोनुर्लीतील महामार्ग ठेकेदाराच्या क्रशरवर हे खासदार गेले होते. त्यावेळी त्या क्रशरपासून होणारा त्रास नागरिकांनी दाखवून दिला होता.अवघ्या चार दिवसांत क्रशर बंद पाडू असे आश्वासन त्यावेळी त्यांनी स्थानिकांना दिले होते. तीही केवळ भूलथापच ठरली आहे, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग