शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

‘त्या’ अधिकाºयांवर गुन्हे दाखल होतील- : उपलोकायुक्तांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 8:07 PM

येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कारभारावर उपलोकायुक्त शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आर्थिक घोटाळ््यावर कारवाई न करणाºया शासकीय अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे त्यांनी सांगितले

ठळक मुद्दे वेंगुर्लेतील नारायण तलाव भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी
वेंगुर्ले : येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कारभारावर उपलोकायुक्त शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आर्थिक घोटाळ््यावर कारवाई न करणाºया शासकीय अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी १४ जून २०१९ रोजी ठेवली असून, प्रतिवादींनी सुनावणीत समोर आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सादर करावीत, अशी सूचना केली आहे.वेंगुर्ले येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराची सुनावणी मंगळवारी सकाळी उपलोकायुक्त शर्मा यांच्या दालनात पार पडली. तक्रारदार अतुल हुले सुनावणीला उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यातर्फे आनंद हुले यांनी बाजू मांडली, तर प्रतिवादी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पालांडे, कार्यकारी अभियंता रमेश मठकर तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव साबळे सुनावणीला उपस्थित होते.नारायण तलाव दुरुस्तीतील घोटाळा कसा दडपला गेला याबाबत तक्रारदारांनी बाजू मांडल्यावर उपलोकायुक्त शर्मा यांनी महाराष्ट्र शासनाच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देणाºया प्रवृत्तीवर कडक ताशेरे ओढत सर्व गैरअधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले.निकृष्ट काम करणाºया कंत्राटदारावर शासनाने गुन्हा दाखल का केला नाही? संबंधित गैरअधिकाºयांची खातेनिहाय चौकशी पूर्ण का झाली नाही? महाराष्ट्र शासनाचे नुकसान झाले, ते कंत्राटदाराकडून का वसूल करण्यात येत नाही? निकृष्ट काम करणाºया कंत्राटदाराला काळ््या यादीत का टाकले नाही? काम असमाधानकारक असताना वाढीव रकमेची बिले कशी मंजूर करण्यात आली? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.काय आहे नारायण तलाव भ्रष्टाचार प्रकरण?वेंगुर्ले शहरातील बारमाही पाण्याचे स्रोत असलेला ब्रिटिशकालीन नैसर्गिक तलाव. शेजारील सूर्य मंदिरामुळे या तलावास नारायण तलाव नाव पडले. बांधकामात दगड व चुन्याचा वापर असलेला हा तलाव ब्रिटिशकालीन वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. याठिकाणी जलशुद्धीकरण व वितरण व्यवस्था होती.२००० सालापर्यंत संपूर्ण वेंगुर्ले शहरात गुरुत्वाकर्षणाने बारमाही पाणीपुरवठा होत होता. या तलावाची देखभाल होत नसल्याने तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता व त्यामुळे वेंगुर्लेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत गेला. २००४ मध्ये या तलावातील गाळ काढणे व दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आले.बांधकाम करताना योग्य पद्धतीने काम होत नसल्याने तलावाच्या भिंतीची मोडतोड करण्यात आली व ब्रिटिशकालीन तांब्याच्या वॉल्वची चोरी केली. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार अतुल हुले यांनी संबंधित यंत्रणेकडे वारंवार केली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचे काम संबंधित यंत्रणेने केले.
टॅग्स :fraudधोकेबाजीkonkanकोकण