शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

कनेक्टिंग पीपल कुडाळ तालुक्यात ‘डेड’, बीएसएनएल सेवा कोलमडली, ग्राहक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:58 PM

कनेक्टिंग पीपल असे ब्रीद वाक्य असलेल्या बीएसएनएलची मोबाईल सेवा कुडाळ तालुक्यात सध्या पूर्णपणे कोलमडली असून ग्राहक हैराण झाले आहेत. योग्य सेवा न दिलेल्या कालावधीत ग्राहकांचे झालेले नुकसान बीएसएनएल विभाग भरून देणार का? असा सवाल ग्राहकांतून विचारला जात आहे. कोलडलेल्या सेवेमुळे कंपनीचे ग्राहकही कमी होत असल्याचे चित्र दिसत आहेत.

ठळक मुद्देग्राहक वळले खासगी कंपनीकडेइंटरनेट सेवाही डबघाईसनुकसान भरपाई देणार का?

रजनीकांत कदम कुडाळ : कनेक्टिंग पीपल असे ब्रीद वाक्य असलेल्या बीएसएनएलची मोबाईल सेवा कुडाळ तालुक्यात सध्या पूर्णपणे कोलमडली असून ग्राहक हैराण झाले आहेत. योग्य सेवा न दिलेल्या कालावधीत ग्राहकांचे झालेले नुकसान बीएसएनएल विभाग भरून देणार का? असा सवाल ग्राहकांतून विचारला जात आहे. कोलडलेल्या सेवेमुळे कंपनीचे ग्राहकही कमी होत असल्याचे चित्र दिसत आहेत.

एकीकडे सरकार डिजिटल भारत बनविण्यासाठी घोषणा करीत आहे, तर दुसरीकडे भारत सरकारचा अधिकृत उपक्रम असलेल्या बीएसएनएल कंपनीची मोबाईल सेवा कोलमडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कुडाळ शहराबरोबरच तालुक्यातील अनेक गावातील बीएसएनएलच्या मोबाईल सेवेचे तीनतेरा वाजले आहेत.

ग्राहकांनी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास कमीत कमी दहा ते वीस वेळा नंबर डायल केल्यानंतर फोन लागतो. नाहीतर बहुतेक वेळा नॉट रिचेबल, बिझी, एक रिंग वाजून कॉल कट होणे असे प्रकार होत आहेत. या सेवेमुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील बीएसएनलच्या मोबाईल टॉवरची योग्य प्रकारे दुरूस्ती केली जात नसल्याने तसेच अधिकारी वर्गाचे होत असलेले दुर्लक्ष ही बीएसएनएल मोबाईल सेवा कोलमडण्याची प्रमुख कारणे आहेत. या तालुक्यात नवीन टॉवर उभारा, पण त्या अगोदर जुने टॉवर दुरूस्त करा, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे.

इंटरनेट सेवाही डबघाईसतालुक्यातील बीएसएनएलची इंटरनेट सेवाही डबघाईला आली आहे. कुडाळ शहरात काही प्रामाणात इंटरनेट सेवा चांगली असली, तरी ग्रामीण भागात मात्र पूर्णपणे डबघाईला आली असून, अनेक वेळा इंटरनेट सेवा बंदच असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

नुकसान भरपाई देणार का?बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे ठराविक कालावधीसाठी टॉक टाईम, नेट पॅक घेतलेल्या ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्राहकांच्या होणाºया नुकसानाची बीएसएनएल भरपाई देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार विस्कळीत होणाºया सेवेबाबत विचारणा केली असता बीएसएनएल कार्यालयाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची तक्रारही आहे.

ग्राहकांच्या संख्येत घट?बीएसएनएल मोबाईल सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असताना खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा मात्र चांगल्या पध्दतीने सुरू असल्याने ग्राहक या कंपन्यांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएल कंपनी विविध योजना जाहीर करते. प्रत्यक्षात मात्र सेवा विस्कळीत असल्यामुळे ग्राहक हैराण झाले असून, तालुक्यात बीएसएनएल ग्राहकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलsindhudurgसिंधुदुर्ग