शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

भाजपने राणेंना वाटेल तितकी ताकद पुरवावी, शिवसेना पुन्हा भगवा फडकवणारच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:57 PM

Vaibhav Naik Shivsena Sindhudurg- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाटेल तितकी ताकद पुरवावी. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा एकदा त्यांना शह देऊन भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देभाजपने राणेंना वाटेल तितकी ताकद पुरवावीशिवसेना पुन्हा भगवा फडकवणारच  :वैभव नाईक

कणकवली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाटेल तितकी ताकद पुरवावी. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा एकदा त्यांना शह देऊन भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या अगोदर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी पदे देऊन नारायण राणेंना ताकद पुरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी राणेंचा माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.

त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली नाही. दरम्यान, काँग्रेस पक्षही त्यांना सोडावा लागला होता. त्यामुळे राणेंना ताकद पुरवताना ते पुन्हा एकदा शिवसेनेविरोधात निवडणूक लढवणार किंवा नाही, याची खातरजमा शहांनी करून घ्यावी.जर राणेंनी पुढची विधानसभा निवडणूक लढवली, तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची जबाबदारी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून सर्वस्वी माझी राहील. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख ह्यमहाराष्ट्राचे दबंग नेतेह्ण असा केला. मग, या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देताना ह्यतारीख पे तारीखह्ण देऊन वर्षभर ताटकळत का ठेवले होते? या प्रश्नाचे उत्तरसुद्धा त्यांनी द्यायला हवे होते.राणेंची नेमकी प्रतिमा काय आहे, हे जाणून घ्यायचे असेल, तर फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या सभागृहात त्यांच्यावर केलेल्या भाषणाचा व्हिडीओ शहा यांनी आवर्जून पहावा. अमित शहांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दाखले दिले. तसेच शिवसेना संपवण्याची भाषासुद्धा केली. पण त्यांना ते शक्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.भाजपने त्यांचे विचार कोठे बुडविले?शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार तापी नदीत बुडविले, असे ते म्हणतात. मग, जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीच्या महबुबा मुफ्तीसोबत भाजपने युती करून सत्ता स्थापन केली होती, तेव्हा आरएसएसच्या हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, नानाजी देशमुख या नेत्यांचे विचार शहांनी कोणत्या नाल्यात बुडविले होते, असा प्रश्नही या प्रसिद्धीपत्रकात वैभव नाईक यांनी केला आहे.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग