शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दाट धुक्यापासून सावधानता बाळगा!

By admin | Updated: November 6, 2014 21:59 IST

हीच धुक्याची लाट महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरते. या दाट धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्याने अपघात होतात.

देवरुख : हिवाळा म्हटला की, कुडकुडायला लावणारी गुलाबी थंडी पडते. या गुलाबी थंडीच्या जोडीला दाट धुक्याची झालर दऱ्याखोऱ्यात दूरपर्यंत पसरलेली दिसते. मात्र, हीच धुक्याची लाट महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरते. या दाट धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्याने अपघात होतात. त्यामुळे वाहनचालकांनो दाट धुक्यापासून सावधानता बाळगा, असा इशारा देण्याची वेळ आली आहे.खरेतर थंडीच्या दिवसांमधून नदीकाठच्या गावांमध्ये गडद धुक्याची छाया पसरलेली दिसते. हे धुके सायंकाळी उशिरा आणि पहाटे अधिक प्रमाणात पाहायला मिळते. कोल्हापूर मार्गावर आंबा घाटामध्ये, साखरपा मुर्शी, तसेच संगमेश्वर-देवरुख मार्गावर करंबेळे घाटीमध्ये, लोवले-बुरंबी तसेच देवरुख-रत्नागिरी मार्गावर तुळसणी, पांगरी याबरोबरच मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्याचा विचार करता बावनदी, वांद्री, आंबेड, मानसकोंड, कुरधुंडा, गोळवली, तुरळ, आरवली या परिसरात धुक्याची मोठी लाट पसरलेली दिसते आणि हे धुके पहाटेच्या वेळी अधिक गडद होताना दिसते. सकाळी नऊ वाजेपर्यंत दाट धुके असते.गडद झालेल्या धुक्यातून मार्ग शोधणे कठीण होऊन बसते. त्यातच महामार्गावर अतिवेगाचा वापर केल्यास समोर अचानक आलेले वाहन न दिल्यास अपघात होतो. काही अंशी पहाटेच्या वेळी गाड्या मार्ग सोडून दरीत कोसळण्याचे अथवा झाडावर आदळण्याचे प्रसंग घडल्याचे दिसून येत आहेत.या साऱ्याचा विचार करुन वाहनचालकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवत दाट धुक्यामध्ये सावधानता बाळगून काळजी घेणे प्रवाशांच्या हिताचे आहे. धुक्यामुळे अपघात घडतात, अशा चर्चा अपघातस्थळी अथवा अपघातानंतर होताना ऐकायला मिळते. बुधवारी सकाळी ६.३०च्या दरम्यान स्वीफ्ट डिझायर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेला अपघातदेखील धुक्यामुळेच झाला असल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले. सध्या होणाऱ्या अपघातामध्ये पहाटे चार ते सहा या काळात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. याचाच अर्थ हे अपघात धुक्यात काळजी न घेतल्यामुळे चालकांच्या चुकीमुळे घडतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चालकांनी सतर्कता बाळगावी व वेगावर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)दाट धुके ठरतेय अपघाताला कारणीभूत.दाट धुक्यामध्ये हवेय वेगावर नियंत्रण.अपघाताला कारण ठरणाऱ्या धुक्यातून वाहन नियंत्रित वेगाने हाकणे गरजेचे.चालकांनी सावधानता बाळगल्यास अपघात टळतील. सतर्कता बाळगल्यास मनुष्यहानी टळेल.सुरक्षितता बाळगा.