शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई, आशिष शेलार यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 11:59 AM

अवेळी पडलेल्या पावसामुळे कोकणात सर्वत्र भातशेतीचे नुकसान झाले आहे. शासन नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलून बदल करण्याची मागणी करणार आहे, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई, आशिष शेलार यांची ग्वाही कोलगाव येथील भातशेती नुकसानीची केली पाहणी

सावंतवाडी : अवेळी पडलेल्या पावसामुळे कोकणात सर्वत्र भातशेतीचे नुकसान झाले आहे. गुंठाभर जागेत भातशेती करायची झाली तर सातशे-आठशे रुपये खर्च येतो. पण शासन नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून बदल करण्याची मागणी करणार आहे. या संकटातून पुन्हा कोकण उभा करायचा आहे, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.मंत्री शेलार यांनी शनिवारी कोलगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देताना सरकार कसे सकारात्मक आहे हे पटवून दिले.यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर, दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष महेश सारंग, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, राजू राऊळ, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.मंत्री शेलार यांनी प्रथम कोलगाव येथील सरमळकर यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी भात पूर्णत: खाली पडले होते. तर काही कुजले होते. यावेळी शेतकरी सरमळकर यांनी आम्ही भाड्याने जागा घेऊन शेती करतो आणि अवेळी पावसामुळे आमचे पूर्ण नुकसान होते, अशी व्यथा मांडली. तोच मुद्दा मंत्री शेलार यांनी धरून शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगितले. कोकणाला पुन्हा उभे करण्याची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे स्पष्ट केले.आमदार नीतेश राणे म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे आता तरी नुकसान भरपाई त्वरित मिळावी.

भरपाईला वेळ झाला तर शेतकरी अडचणीत येतो. जर कोण पंधरा हजार नुकसान भरपाई मिळेल असे सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. शेतकºयांनी आपणास काय वाटते ते सांगितले पाहिजे. तरच परिपूर्ण अहवाल शासनापर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले.निष्कर्ष बदलण्याची विनंती करणारजर एखाद्या शेतकऱ्याला गुंठ्यामागे सातशे रुपये खर्च येत असेल आणि शासन त्यांना नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देत असेल तर शेतकऱ्यांना कसे परवडेल? असा सवाल करीत मी आजच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे सर्व निष्कर्ष बदलण्याची विनंती करणार आहे. कारण सरकार सकारात्मक आहे. मला मुख्यमंत्र्यांनी पाठवले असल्याने यावर तातडीने निर्णय होईल, असा विश्वासही मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग