शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
5
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
6
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
7
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
8
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
9
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
10
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
11
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
12
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
13
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
14
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
15
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
16
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
17
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
18
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
20
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली

अंगणवाडीच नवीन पिढीचा खरा पाया

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

संदेश सावंत : आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस पुरस्कार वितरण

सिंधुदुर्गनगरी : समाजातील नवीन पिढीचा पाया रचण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. अंगणवाडीच नवीन पिढीचा पाया आहे. भावी पिढीचे भवितव्य घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम आपण जबाबदारीने पार पाडण्याचे महान कार्य आपल्या हातून घडत आहे, हे आदर्शवत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार वितरण सोहळ््यात बोलताना केले.जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस पुरस्कार २०१३-१४चा वितरण सोहळा येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, सभापती स्नेहलता चोरगे, गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य रूक्मिणी कांदळगावकर, श्रावणी नाईक, महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.यावेळी गुणवत्तेसह विविध प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मालवण तालुक्यातील वराड हडपीडवाडी येथील नम्रता नाना परब यांना राज्यस्तरीय पुरस्कारासह रोख ५ हजार रूपयाचे बचतपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षकांना यावर्षीपासून प्रथमच पुरस्कार देण्यात आले. यामध्ये कणकवली तालुक्यातील वरवडे प्रभागातील सुप्रिया जनार्दन पुजारे, कळसुली प्रभागातील मधुरा मनोहर मांजरेकर, तर वेंगुर्ले तालुक्यातील माधुरी गुरूनाथ मेस्त्री यांना ३ हजार रूपयांचे जिल्हास्तरीय पुरस्कार संदेश सावंत यांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले.जिल्ह्यातील ४८ प्रभागातील ४८ अंगणवाडी सेविका, ४८ मदतनीस अशा ९६ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बचतगट, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी संदेश सावंत म्हणाले, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हाती समाजाची नवीन पिढी घडविण्याचे महान कार्य आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी हे काम प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत. त्यातही आदर्श असे काम करणाऱ्यांचा आज गौरव झाला. या कामात सर्वांनी सातत्य राखावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)अंगणवाडी कर्मचारी प्रत्येक लहान मुलाला आईचे प्रेम देऊन चांगल्या सवयी लावतात. त्यामुळेच पालक आपल्या मुलांना त्यांच्या स्वाधीन करून बिनधास्त राहतात. मनात कोणतीही स्वार्थी भावना न बाळगता भावी पिढीला चांगले संस्कार देण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे. अल्प मानधनात समाजसेवा करण्याचे काम घडत आहे. हे कोणत्याही कामापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे, त्यामध्ये सातत्य ठेवा.- दिलीप पांढरपट्टे,मुख्य कार्यकारी अधिकारी.