शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

अंगणवाडीच नवीन पिढीचा खरा पाया

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

संदेश सावंत : आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस पुरस्कार वितरण

सिंधुदुर्गनगरी : समाजातील नवीन पिढीचा पाया रचण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. अंगणवाडीच नवीन पिढीचा पाया आहे. भावी पिढीचे भवितव्य घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम आपण जबाबदारीने पार पाडण्याचे महान कार्य आपल्या हातून घडत आहे, हे आदर्शवत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार वितरण सोहळ््यात बोलताना केले.जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस पुरस्कार २०१३-१४चा वितरण सोहळा येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, सभापती स्नेहलता चोरगे, गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य रूक्मिणी कांदळगावकर, श्रावणी नाईक, महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.यावेळी गुणवत्तेसह विविध प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मालवण तालुक्यातील वराड हडपीडवाडी येथील नम्रता नाना परब यांना राज्यस्तरीय पुरस्कारासह रोख ५ हजार रूपयाचे बचतपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षकांना यावर्षीपासून प्रथमच पुरस्कार देण्यात आले. यामध्ये कणकवली तालुक्यातील वरवडे प्रभागातील सुप्रिया जनार्दन पुजारे, कळसुली प्रभागातील मधुरा मनोहर मांजरेकर, तर वेंगुर्ले तालुक्यातील माधुरी गुरूनाथ मेस्त्री यांना ३ हजार रूपयांचे जिल्हास्तरीय पुरस्कार संदेश सावंत यांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले.जिल्ह्यातील ४८ प्रभागातील ४८ अंगणवाडी सेविका, ४८ मदतनीस अशा ९६ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बचतगट, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी संदेश सावंत म्हणाले, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हाती समाजाची नवीन पिढी घडविण्याचे महान कार्य आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी हे काम प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत. त्यातही आदर्श असे काम करणाऱ्यांचा आज गौरव झाला. या कामात सर्वांनी सातत्य राखावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)अंगणवाडी कर्मचारी प्रत्येक लहान मुलाला आईचे प्रेम देऊन चांगल्या सवयी लावतात. त्यामुळेच पालक आपल्या मुलांना त्यांच्या स्वाधीन करून बिनधास्त राहतात. मनात कोणतीही स्वार्थी भावना न बाळगता भावी पिढीला चांगले संस्कार देण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे. अल्प मानधनात समाजसेवा करण्याचे काम घडत आहे. हे कोणत्याही कामापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे, त्यामध्ये सातत्य ठेवा.- दिलीप पांढरपट्टे,मुख्य कार्यकारी अधिकारी.