शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘परीक्षा अनिवार्य’चा निर्णय झाल्यास स्वागत!

By admin | Updated: August 25, 2015 23:49 IST

शिक्षणक्षेत्रातून दूर : अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद राबविणार विशेष मोहीम

सातारा : शिक्षण हक्क कायद्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याची असलेली तरतूद बदलण्याची मागणी महाराष्ट्रासह इतर काही राज्यांनी केंद्रीय सल्लागार मंडळाच्या बैठकीत केली. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सरसकट ढकलपास करण्याचे धोरण बदलण्यात यावे, अशी मागणीही राज्याच्या शिक्षण खात्याने केली होती. त्यानुसार परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढच होणार आहे, त्यामुळे स्वागतच असेल, असा सूर शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २०१० मध्ये अस्तित्वात आला. त्यानुसार पहिलीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना केवळ श्रेणी देण्याची तरतूद केली होती. त्यामुळे किमान आठवीपर्यंत नापास होण्याची शक्यताच नसल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. अशी मुलं दहावीला नापास होतात, असे मत काही शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे केंद्रीय सल्लागार मंडळाच्या बैठकीत काही राज्यांच्या राज्यमंत्र्यांनी विद्यमान धोरणाला विरोध केला आहे. या कायद्यात बदल झाल्यावर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास सुरुवात केल्यावर एक-दोन विषयांत एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास शिक्षकांनी त्याची त्या विषयांची तयारी करुन घ्यावी व त्याला पुढील वर्गात पाठवावे. मात्र, चार ते पाच विषयांत विद्यार्थी नापास झाल्यास त्याला पुढील वर्गात ढकलण्यात येणार नाही. त्याच्यातील गुण, कल ओळखून त्याला त्या क्षेत्रात संधी देण्यात येणार आहे. या निर्णयाचे मुख्याध्यापक, पालकांमधून स्वागत केले असले तरी काहींच्या मते आहे. ही पद्धत विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीस पोषकच आहे, असे शिक्षकांना वाटते. हसत खेळत शिक्षण पद्धतीचा अवलंब अनेक वर्षांपूर्वीपासून करत असल्याचे अनेकांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)फेरअध्यापनावर भर देणार : कुळालशिक्षण हक्क कायद्यानुसार २०१०पासून पहिली ते आठवीच्या परीक्षा घेतल्या जात नाहीत. विद्यार्थी ज्या विषयात मागे पडत असतील त्या विषयाची पुन्हा पुन्हा तयारी करुन घेतली जाणार आहे. फेरअध्यापन केले जाणार आहे. परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास त्या शिक्षण संस्थांना घ्याव्याच लागणार आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास कुळाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.विद्यार्थ्याला पहिली ते आठवीपर्यंत नापासच करायचे नाही. या कायद्यामुळे पालक व विद्यार्थी दोघांच्यातही उदासिनता दिसून येते. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार तर मिळालाच पाहिजे. परंतु त्यांच्या बौद्धिकतेची परिक्षा घेवुन त्याची गुणवत्ता ठरविली पाहिजी. त्यासाठी शासनाच्या या कायद्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.- महादेव देशमाने, मुख्याध्यापक, जि. प. शाळा म्हारूगडेवाडी,कऱ्हाडसातत्यपूर्ण सर्वकश मुल्यमापन या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक व बौध्दीक विकास किती झाला हे कळते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यास ही प्रक्रिया उपयुक्त आहे. या प्रक्रियेचे महत्त्व पालकांना पाटवून द्यावे लागले.- अनिल सपकाळ, मुख्याध्यापक, बापुसाहेब शिंदे विद्यालय, चिखली, ता. वाईशिक्षणाचा अधिकार २००९ या कायद्यामुळे मुले इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत नापासच होत नाहीत. पण त्याचा परिणाम अद्यापनावरतीही होत आहे. वर्गात बसणारे अन् न बसणारे दोघेही पास होत असल्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धीकतेलाही वाव मिळत नाही. त्यामुळे या कायद्याचा फेर विचार व्हावा.- अर्जुन कोळी, मुख्याध्यापक, कऱ्हाड नगरपालिका, शाळा क्र. ३