शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आनंदवार्ता!, सातारा जिल्ह्यातील पाणी टंचाई संपली; शेवटची फेरी मारून टँकर परतला

By नितीन काळेल | Updated: October 18, 2024 19:23 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे सुरू झालेले टँकर वर्षभरानंतर बंद झाले. गुरूवारी माण तालुक्यात टँकरची शेवटची फेरी झाली. तर ...

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे सुरू झालेले टँकर वर्षभरानंतर बंद झाले. गुरूवारी माण तालुक्यात टँकरची शेवटची फेरी झाली. तर यावर्षी मे महिन्यात २१८ गावे ७१६ वाड्यावस्त्यांसाठी २०८ टँकरचा धुरळ उडत होता.जिल्ह्यात गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या अवघे ६५ टक्केच पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे पूर्व दुष्काळी भागातील तलाव, विहिरी ही कोरड्या होत्या. तर पश्चिम भाग पावसाचा असूनही कोयनासह प्रमुख मोठे पाणी प्रकल्पही भरले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झालेली. परिणामी ऑक्टोबर महिन्यापासून दुष्काळी उपाययोजना सुरू होत्या. त्याचवेळी पूर्व भागातील तालुक्यातून पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी झाली होती. त्यानुसार टप्प्याटप्प्याने टँकर सुरू झाले.नोव्हेंबर महिन्यापासून टँकरला सुरूवात झाली. त्यानंतर उन्हाळा सुरू झाल्यानंतर टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत गेली. हळूहळू जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात टँकर सुरू झाले. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यात टंचाईने उग्र स्वरुप गाठले. यामध्ये ७५ टक्के माण तालुका टंचाईच्या फेऱ्यात होता. तसेच खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातही टँकरग्रस्त गावांची संख्या वाढत गेली. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टँकर सुरू होते. यामध्ये माण तालुक्यात ७१ गावे आणि ४४५ वाड्या तहानलेल्या होत्या. माणमधील १ लाख २६ हजार नागरिक आणि १ लाख ३७ हजारांवर पशुधनाला टॅंकरच्याच पाण्याचा आधार होता. खटाव तालुक्यातही ५५ गावे आणि १४५ वाड्यांसाठी ४१ टॅंकरे पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर ८४ हजार नागरिक आणि ४५ हजार जनावरांची तहान अवलंबून होती. फलटण तालुक्यातही ४२ गावे ११३ वाड्या, कोरेगाव तालुक्यात ३३ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच खंडाळा, वाई, कऱ्हाड या तालुक्यातही टॅंकर सुरू होता. त्यामुळे मे महिन्यात ३ लाख ३२ हजार नागरिक आणि अडीच लाखांवर पशुधनाला टॅंकरच्याच पाण्याचा आधार होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळRainपाऊस