शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

आनंदवार्ता!, सातारा जिल्ह्यातील पाणी टंचाई संपली; शेवटची फेरी मारून टँकर परतला

By नितीन काळेल | Updated: October 18, 2024 19:23 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे सुरू झालेले टँकर वर्षभरानंतर बंद झाले. गुरूवारी माण तालुक्यात टँकरची शेवटची फेरी झाली. तर ...

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे सुरू झालेले टँकर वर्षभरानंतर बंद झाले. गुरूवारी माण तालुक्यात टँकरची शेवटची फेरी झाली. तर यावर्षी मे महिन्यात २१८ गावे ७१६ वाड्यावस्त्यांसाठी २०८ टँकरचा धुरळ उडत होता.जिल्ह्यात गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या अवघे ६५ टक्केच पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे पूर्व दुष्काळी भागातील तलाव, विहिरी ही कोरड्या होत्या. तर पश्चिम भाग पावसाचा असूनही कोयनासह प्रमुख मोठे पाणी प्रकल्पही भरले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झालेली. परिणामी ऑक्टोबर महिन्यापासून दुष्काळी उपाययोजना सुरू होत्या. त्याचवेळी पूर्व भागातील तालुक्यातून पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी झाली होती. त्यानुसार टप्प्याटप्प्याने टँकर सुरू झाले.नोव्हेंबर महिन्यापासून टँकरला सुरूवात झाली. त्यानंतर उन्हाळा सुरू झाल्यानंतर टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत गेली. हळूहळू जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात टँकर सुरू झाले. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यात टंचाईने उग्र स्वरुप गाठले. यामध्ये ७५ टक्के माण तालुका टंचाईच्या फेऱ्यात होता. तसेच खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यातही टँकरग्रस्त गावांची संख्या वाढत गेली. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टँकर सुरू होते. यामध्ये माण तालुक्यात ७१ गावे आणि ४४५ वाड्या तहानलेल्या होत्या. माणमधील १ लाख २६ हजार नागरिक आणि १ लाख ३७ हजारांवर पशुधनाला टॅंकरच्याच पाण्याचा आधार होता. खटाव तालुक्यातही ५५ गावे आणि १४५ वाड्यांसाठी ४१ टॅंकरे पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर ८४ हजार नागरिक आणि ४५ हजार जनावरांची तहान अवलंबून होती. फलटण तालुक्यातही ४२ गावे ११३ वाड्या, कोरेगाव तालुक्यात ३३ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच खंडाळा, वाई, कऱ्हाड या तालुक्यातही टॅंकर सुरू होता. त्यामुळे मे महिन्यात ३ लाख ३२ हजार नागरिक आणि अडीच लाखांवर पशुधनाला टॅंकरच्याच पाण्याचा आधार होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळRainपाऊस