शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वडूजला लागलंय नगरपंचायतीचे वेध

By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST

ग्रामपंचायतीवर वाढता ताण : ग्रामस्थांच्या आशा पल्लवित; जोरदार चर्चा सुरू--गाव होतंय मोठं - एक

शेखर जाधव -- वडूज -खटाव तालुक्याची राजधानी म्हणून वडूज शहराची एक वेगळी ओळख तर आहेच; परंतु त्याचबरोबरीने हुतात्म्यांची भूमी म्हणून राज्यालाही हे शहर परिचित आहे. २५ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या वडूज शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. तर नागरिकांना सोयी-सुविधा देताना ग्रामपंचायतीवर पडणारा अतिरिक्त ताण ही नगरपंचायत झाल्यास जाणवणार नाही. त्यामुळे वडूज नगरपंचायत होणार या नुसत्या चर्चेमुळे वडूजमधील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.संभाव्य नगरपंचायतीचे शिल्पकार कोण? यासाठी लवकरच ‘फ्लेक्स वॉर’ सुरू होईल. मात्र त्यापूर्वीच चौकाचौकात संभाव्य उमेदवारांचे वाढदिवसानिमित्त अथवा इतर सामाजिक उपक्रमाचे बोर्ड झळकू लागले आहेत. नगरपंचायत जाहीर होण्यापूर्वीच वडूजमधील राजकीय वातावरणाने चांगलाच पेट घेतला आहे. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर या ना त्या कारणाने वडूज परिसरात फटाक्यांची आतषबाजी होत आहे. मोहित करणारे आकाशातील फटाके आणि कर्णकर्कश फटाके, यामुळे नगरपंचायतीचा बिगुल वाजला हे न समजणारे वडूजकर तर मग कसले!वडूज नगरपंचायतीला पहिला नगराध्यक्ष व नगरसेवक बनण्यासाठीही अनेकांनी आतापासूनच व्यूहरचना आखली आहे. तर प्रभाग कसे पडणार, आपला पत्ता कसा चालेल, यासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. साम, दाम, दंड यांची रंगीत तालीम ही सुरू आहे. नगरपंचायत होणार या चर्चेतच वडूज नगरी बरोबरीने खटाव तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळले आहे.आता मात्र शिवसेना-भाजप, रासप व इतर पक्षांनाही नगरपंचायतीमुळे संधी प्राप्त होऊ शकते.वडूज नगरपंचायत होणार यामुळे ग्रामीण भागातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी नि:श्वास सोडला असून, आता आपल्याला जिल्हा परिषद सदस्य होण्यास कोणीच रोखू शकत नसल्याचे स्वप्न पडू लागली आहेत. नगरपंचायतीच्या दिव्यस्वप्नात स्थानिक नेते मंडळी हरवलेली असली तरी ब्रह्मअस्त्रांचा राजकीय माऱ्याला ते कसे तोंड देतात हा येणारा काळच ठरवणार आहे. या बातमीमुळे वडूजचे नागरिक सुखावले असले तरी नेमका काय फायदा व तोटा, याकडे न पाहता आता सोयी-सुविधा मिळणार याच आनंदोत्सवात आदेशाची वाट पाहत दिवाळी सुटीचा उपभोग घेत आहेत. राजकीय नेत्यांचे महत्त्व होणार कमी?जिल्ह्याच्या व तालुक्याच्या राजकारणात वडूच्या नेत्यांना आत्तापर्यंत राजकीय अनन्य साधारण महत्त्व होते. मात्र नगरपंचायतीनंतर हे महत्त्व कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सत्तेच्या समीकरणात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्हीच पक्षांचा अदलाबदल करून समावेश असायचा. हुतात्म्यांची भूमी असा राज्यात ठसावडूज शहर खटाव तालुक्याची राजधानी असले तरीही त्याला हुतात्म्यांची भूमी म्हणून राज्यात ओळख आहे. स्वातंत्र्य संग्रामात येथील भूमीचे आणि भूमीपूत्रांचे योगदानही मोठे आहे.