शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

‘राम-लक्ष्मणा’च्या जोडीवर उदयनराजेंनी डागली पुन्हा तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 00:04 IST

वाई-खंडाळा बैठक : भ्रष्टाचारामुळे राष्ट्रवादीची राज्यात वाताहात

वाई : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी इच्छुकांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची दमछाक होत असतानाच राष्ट्रावादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेची सत्ता गाजवणाऱ्या राम-लक्ष्मण जोडीलाच लक्ष केल्याने राष्ट्रवादी पुढे आणखी पेच वाढला आहे़ उदयनराजे यांनी खंडाळ्यातील बैठक आटोपून वाई येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा बँकेच्या निवडणूक संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षावर आरोप-प्रत्यारोप करीत पक्षाला घरचा आहेर दिला आहे़उदयनराजे म्हणाले की, ‘जिल्हा बँकेच्या कारभाराविषयी मी पोट तिडकीने आवाज करीत वेळोवेळी सामान्यांच्या हितासाठी बँकेतील राजकारण व घडामोडी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. प्रस्थापितांना खड्यासारखे बाजूला ठेवून नवीन चेहऱ्यांना संधी मिळणे आवश्यक आहे़ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही सातारा जिल्ह्यात असून, तिची सूत्रे बारामतीतून हालविली जातात, ती काय पुणे जिल्ह्याची बँक नव्हे़ बँकेतील राजकारण सत्ताधाऱ्यांनी कोणालाही कळून दिले नाही़ बारामतीकरांना खूश करण्यासाठी या राम-लक्ष्मण जोडीने जिल्ह्याचा स्वाभिमान गहाण टाकला आहे़ जिल्ह्यातील आठ आमदार व एक खासदार जिल्ह्याचे मालक नसून जिल्ह्यातील वीस लाख जनता हीच खरी मालक आहे़ सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी हे लोक सत्तेचे केंद्रीकरण करतात. जिल्हा बँक, साखर कारखाने, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी हे सर्व याच लोकांना पाहिजे़ हे लोक कुटुंब केंद्रित राजकारण करतात, असे राज्यात कुटुंब केंद्रित राजकारण करणाऱ्या कुटुंबांना जनतेने धडा शिकविला आहे़ तुमच्यात हिंमत असेल तर मी गांधी मैदानावर खुल्या चर्चेस तयार असून, एकदाच आपला सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी) किसन वीर कारखान्यावर पाचशे कोटींच्या कर्जाचा बहाणा करून राष्ट्रावादीने या निवडणुकीतून माघार घेतली आहे़; पंरतु त्यांनी या रकमेतून कारखान्यावर डोंगरावएवढे विविध प्रकल्प उभारले यातून ते कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहेत़ इतरांसारखे सहकार मोडून कारखान्याचे खासगी करून घशात घातले नाही. जरंडेश्वरचा गुरू कोण आहे, हे मी शोधून काढणार आहे. बँकेची निवडणूक झाल्यानतंर त्याच्या घशातून कारखाना काढून जनतेच्या स्वाधीन करणार आहे़ खर्डेकर, पोळ, वाठारकरांना आपल्यामुळेच संधी मी आग्रहाची भूमिका घेतल्यानेच दादाराजे खर्डेकर, सदाशिव पोळ व विलासबापू वाठारकर यांना बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली, असा दावाही उदयनराजेंनी यावेळी केला.