शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध पाण्यासाठी एक टन तुरटी

By admin | Updated: July 15, 2015 00:22 IST

लोणंदनगरी सजली : वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा संकल्प

सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंदमध्ये गुरुवार, दि. १६ रोजी येत आहे. दोन दिवसांच्या निमित्ताने येत असलेल्या वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी लोणंदनगर सज्ज झाली आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये, त्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने एक टन तुरटी तर दोनशे पिशव्या टीसीएल पावडर खरेदी केली आहे.वैष्णवांचा मेळा अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी लोणंदनगरीत दोन दिवसांत विसावणार आहे. या काळात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून वीज, पाणी, आरोग्य सुविधा देण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या तयारीकडे सरपंच स्नेहलता शेळके-पाटील स्वत: लक्ष ठेवून आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच गणी कच्छी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी लालासाहेब निंबाळकर रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे निर्जंतुकीकरण केले आहे. लोणंदमधील चार जलकुंभ बेलाचा मळा, जांभळीचा मळा, पाडेगाव पाणीपुरवठा केंद्र येथील जलकुंभ यंत्रांच्या मदतीने स्वच्छ केले आहेत. पाणीपुरवठा योजनेतील मोटर्स व्हॉल्व दुरुस्त केले असून ठिकठिकाणी उघडे पडलेले पाण्याचे व्हॉल्व्ह, बंदिस्त चेंबर बांधले आहेत. आरोग्य विभागातर्फे लोणंद गावठाण अंतर्गत असलेली सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहे दुरुस्ती केली आहेत. अकरा फिरत्या स्वच्छतागृहांच्या वाहनांची दुरूस्ती केली आहे. गावातील गवत काढले असून मुक्काम काळात डीटीटी पावडर टाकण्यात येणार आहे. (वार्ताहर)अखंड पाणीपालखी सोहळा लोणंदनगरीत आल्यापासून तरडगावला जाईपर्यंत अखंड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी सज्ज असून त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. तसेच पालखीतळावर दर्शनासाठी बॅरेकेट केले आहेत,’ अशी माहिती सरपंच स्नेहलता शेळके-पाटील यांनी दिली.