शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

हे आहेत मृत्यूचे नवे ६२ ‘ब्लॅक स्पॉट’ - पोलिसांनी शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:53 AM

ब्लॅक स्पॉट म्हणजे काय? ब्लॅक स्पॉटला वारंवार तीन वर्षांमध्ये एकाच ठिकाणी झालेल्या अपघातांना ब्लॅक स्पॉट असे संबोधले जातेय. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असेल तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून समोर येत आहे.

ठळक मुद्देआता सावधान : जनतेला केलं सतर्कआता आपली जबाबदारी वाढलीय.. नका घेऊ जीवन संपविण्याचा वेग

दत्ता यादव।सातारा : एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे जशा पद्धतीने मृत्यू होणाचे प्रमाण वाढते. त्याच पद्धतीने आता अलीकडे अपघातामध्येही बळी जाण्याचे प्रमाण वाढतेय. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अनेकांचे संसार अक्षरश: उघड्यावर पडत आहेत. यामुळे आता अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील ६२ ब्लॅक स्पॉट शोधून काढले असून, या ठिकाणी प्रशासन उपाययोजना करेलच; परंतु आता नागरिकांचीही जबाबदारी वाढली आहे.

एखादी व्यक्ती अपघातामध्ये मृत्यू झाली तर हे नित्याचेच आहे. (नशिबात होतं) असं समजून आपण त्याकडे कानाडोळा करतो. इतकी नागरिकांची संवेदना आता बोथट होऊ लागली आहे. दोन्ही घटनांमध्येही व्यक्तीचा मृत्यूच झालेला असतो. मात्र, अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. जेवढ्या खुनामध्ये व्यक्ती मृत्यू झाल्या आहेत. त्यापेक्षा अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. कुणाचा भाऊ तर कुणाचा पती, वडील आई असे नातलग अपघातात मरण पावत आहेत. हे कुठंतरी थांबायला हवं. यासाठी आता पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गावरील सातत्याने अपघात होत असलेले ६२ ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. यावर पोलिसांनी अहवाल तयार केला असून, हा अहवाल महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी, विभागाला सादर केला आहे.

येत्या काही दिवसांत या ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना नक्कीच होतील, अशा अपेक्षा करू या. मात्र, नागरिकांनीही आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. केवळ यंत्रणेवर बोट दाखवून गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे सतर्कता हाच सुरक्षित प्रवासाचा मूलमंत्र आहे.

ब्लॅक स्पॉट म्हणजे काय?ब्लॅक स्पॉटला वारंवार तीन वर्षांमध्ये एकाच ठिकाणी झालेल्या अपघातांना ब्लॅक स्पॉट असे संबोधले जातेय. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असेल तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून समोर येत आहे.

ही आहेत ब्लॅक स्पॉटशिंदेवाडी शिरवळ, शेंद्रे कारखाना, पेरले फाटा, उंब्रज, कोर्टी फाटा, मलकापूर फाटा, नारायणवाडी फाटा पाचवड, वाठार फाटा हॉटेल वैष्णवी कºहाड अशी जिल्ह्यात महामार्गावर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत.काय उपाययोजना हव्या..फलक, बॅरिकेट्स, रबलिंग स्ट्रीप, वळण काढून टाकणे, झाडांच्या फांद्या काढणे यासह अन्य काही महत्त्वाच्या उपाययोजना जिल्हा वाहतूक शाखेच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी स्वत: ब्लॅक स्पॉट अपघाताच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली.

 

शासकीय यंत्रणांनी ब्लॅक स्पॉटवर उपयायोजना केल्या आहेतच. मात्र, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अनेक दुर्देवी घटना टळू शकतात.- संदीप भागवत, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू