Satara: चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली, भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:07 IST2025-06-27T18:06:39+5:302025-06-27T18:07:17+5:30
पुरातन चांदोबाचा लिंब पासून दूरवर घेतले रिंगण

Satara: चांदोबाचा लिंब येथील जागा बदलली, भाविकांच्या अभूतपूर्व गर्दीत गोंधळात उरकले संत ज्ञानेश्वर माऊलींचे रिंगण
विकास शिंदे
फलटण :
पायी पायी पंढरीला । माझा वारकरी निघाला
वाटे थांबे विसाव्याला | खेळ विठूचा मांडीला
चाले रिंगण सोहळा | खेळ विठूचा मांडीला |
या भक्ती गीताचा प्रत्यय देणारा सोहळा चांदोबाचा लिंब येथे दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. मात्र यावर्षी या रिंगण सोहळ्याला भाविकांच्या गर्दीने तब्बलवतीं ते चार वेळा जागा पुढे बदलत रिंगण सोहळा कसाबसा पार पाडावा लागला. यामुळे पोलिस प्रशासनाने केलेली सगळी तयारी वाया गेली व आयत्या वेळी भाविकांच्या गर्दीत रिंगण लावावे लागले.
दरवर्षी पुरातन चांदोबाचा लिंब येथे डाव्या बाजूला हे रिंगण लावले जाते. यावर्षी नेहमीच्या जागेवर हे रिंगण लावले होते. यासाठी दोन्ही बाजूला पोलिस, स्वयंसेवक व राष्ट्रीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी संरक्षक दोर लावले होते. मात्र संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा नगारखाना पुढे गेल्यानंतर दोन्ही अश्व रिंगण सोहळ्यासाठी तयार झाले. याच वेळी माऊलींची पालखी पुरातन चांदोबाचा लिंब येथे आली.
रिंगण सोहळ्यात रथा पुढील सत्तावीस दिंड्या दोन्ही बाजूला उभ्या राहतात. यावर्षी रिंगण सोहळ्यासाठी या दिंड्यांना दुतर्फा उभे राहता आले नाही. त्यातच पाठीमागून येणाऱ्या भाविकांचा लोंढा रिंगण सोहळ्यात सामील होत होता. यामुळे अभूतपूर्व गोंधळात तब्बल तीन वेळा जागा बदलून रिंगण नेहमीच्या ठिकाणा पासून अर्धा किलोमीटर अंतरावर कसेबसे रिंगण लावले
याच गर्दीत दोन्ही अश्वांनी वाट काढत त्यांचे कार्य कसेबसे पार पाडले. मात्र रिंगण सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले. यामुळे भाविक नाराज झाले.
रिंगणाची जागा कोणी बदलली?
विश्वस्त व पोलिस यांच्या समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडला असावा तसेच पोलिसांनी दरवर्षी प्रमाणे नेहमीच्या जागेवर बंदोबस्त लावला होता आयत्या वेळी रिंगणाची जागा कोणी बदलली हे समजू शकले नाही
भाविकांची गर्दी व गोंधळ
भाविकांची गर्दी बाजूला करण्यासाठी पोलिस अतोनात प्रयत्न करत होते शेवटी विश्वस्त देखील मदतीला आले परंतू गर्दी काही कमी होत नव्हती त्या मुळे पोलिसांना आयत्या वेळी बदल करावा लागला भाविक नाराज झाले असले तरी भाविकांनी देखील शिस्त पाळायला हवी होती असे काही भाविकांनी मत व्यक्त केले