शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला; दुपारनंतर संततधार..

By नितीन काळेल | Updated: June 20, 2024 19:33 IST

आठ दिवसानंतर दमदार : कोयनानगरला ३९ तर नवजा येथे ६७ मिलीमीटरची नोंद 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात आठ दिवसानंतर पावसाने पुन्हा जाेर धरला असून सायंकाळी पाचपर्यंतच्या ९ तासांत सर्वाधिक पाऊस नवजाला ६७ तर कोयनेला ३९ आणि महाबळेश्वरला ४० मिलीमीटर झाला. तर सातारा शहरातही अनेक दिवसानंतर पावसाला सुरूवात झाली. दुपारी तीनला सुरू झालेल्या पावसाची सायंकाळपर्यंत संततधार होती. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणेही मुश्चील झालेले.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस ७ जूनपूर्वीच दाखल झाला. मागील १५ दिवसांत पूर्व आणि पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली. सध्याही पाऊस सुरूच आहे. पण, पावसाचे प्रमाण कमी झालेले. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लवकर सुरू झाला. परिणामी पेरणी आणि भात लागणीला सुरुवात झाली. आतापर्यंत माण, खटाव, फलटण या तालुक्यात चांगला पाऊस पडला आहे. यामुळे शेती मशागती आणि खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला वेग आला आहे.त्यातच वारंवार पाऊस होत असल्याने जमिनीला वापसा आलेला नाही. त्यामुळे वापसा नसणाऱ्या ठिकाणची पेरणी खोळंबली आहे. तर चांगल्या पावसामुळे पूर्व भागातील ओढ्यांना पाणी वाहात आहे. अनेक गावांतील बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पेरणीनंतर पिकांना पाणी कमी पडणार नाही. तसेच तलावातही साठा वाढला असल्याने पिण्याच्या पाणी योजनांना फायदाच होणार आहे. त्यामुळे अनेक गावांचे टँकरही बंद झाले आहेत.

पश्चिम भागातही पाऊस पडत असला तरी जोर नव्हता. मागील आठ दिवसांपासून पावसाची उघडझाप होती. त्यामुळे अजूनही प्रमुख धरणात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. अशातच गुरुवारी सकाळपासूनच पश्चिम भागात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. यामुळे ओढे खळाळून वाहत आहेत. कास, बामणोली, कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वर भागात पावसाची जोर वाढला आहे. त्यामुळे लवकरच प्रमुख धरणातही पाणीसाठा वाढणार आहे.

कोयना धरणात १४.९० टीएमसी पाणीसाठाकोयना धरणात पाण्याची अजून मोठ्या प्रमाणात आवक सुरू झालेली नाही. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास धरणात १४.९३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३३९ आणि नवजा येथे ४७१ तर महाबळेश्वरला ३२७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी पश्चिम भागात जून महिन्याच्या उत्तरार्धात दमदार सुरूवात झालेली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेतीKoyana Damकोयना धरण