शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Satara: कृष्णा नदीपात्रातील ‘वीर मारुती’ मंदिराचा भराव उद्ध्वस्त!, डागडुजीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:54 IST

संजय पाटील कऱ्हाड : येथील कृष्णा नदीपात्रात असलेल्या वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पायाचे दगड ...

संजय पाटीलकऱ्हाड : येथील कृष्णा नदीपात्रात असलेल्या वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पायाचे दगड निखळले असून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे दगड वाहून गेले आहेत. त्याबरोबरच मंदिराभोवती दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले असून, त्यामुळे भविष्यात मंदिराला मोठा धोका निर्माण होणार आहे.कृष्णा नदीपात्रात प्रीतीसंगमापासून पूर्वेला वीर मारुतीचे मंदिर आहे. त्यालाच ‘मढ्या मारुती’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर पूर्णपणे पात्रात आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर तसेच टेंभू प्रकल्पात पाणी अडवल्यानंतर हे मंदिर पाण्यात जाते. वर्षातील किमान आठ ते नऊ महिने हे मंदिर पाण्यात असते. त्यामुळे भाविकांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. मात्र, सध्या नदीची पाणीपातळी पूर्णपणे खालावली आहे. नदीचे पाणी सैदापूरच्या बाजूने प्रवाहित होत असून, वाळवंट पूर्णपणे रिकामे झाले आहे. त्यामुळे या मंदिरात भाविक दर्शनासाठी जात आहेत.नदीची पाणीपातळी खालावल्यामुळे या मंदिराचा दगडी भराव मोकळा झाला असून, या भरावाची झालेली दुर्दशा दिसून येत आहे. भरावाचे दगड पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत. त्यामुळे पाया पूर्णपणे खचला आहे. दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले आहेत. त्या बाजूचे सिमेंटही उखडले असून, हा पाया पुन्हा भरून मजबुतीकरण न केल्यास भविष्यात मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१८३८ मध्ये उभारले मंदिर

  • कृष्णा नदीतील वाळवंटात सैदापूर बाजूला १८३८ मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली होती.
  • राघोपंत आपटे यांनी नारायण रामचंद्र कुर्लेकर, विठोबा अण्णा दप्तरदार, हरीभट बापूभट वळवडे यांच्या सहकार्याने हे मंदिर बांधले.
  • दगडी चिरेबंदी असलेले हे मंदिर खोडशीच्या धरणानंतर नदीचा प्रवाह बदलल्यामुळे कऱ्हाडच्या वाळवंटात आले.
  • पुरामुळे हानी होऊ नये, अशी योजना मंदिर बांधणीवेळी केली आहे. मात्र, सध्या या मंदिराच्या भरावाचे दगड निखळले आहेत.

वीर मारुती तथा ‘मढ्या मारुती’कृष्णा नदीपात्रात असलेल्या या मंदिराजवळच पूर्वी दहन संस्कार केले जात होते. त्यामुळे त्याला ‘मढ्या मारुती’ या नावाने ओळखले जात होते. मात्र, बाबुराव गोखले यांनी मित्र मंडळाच्या सहाय्याने त्याला ‘वीर मारुती’ असे प्रयत्नपूर्वक म्हणण्यास सुरूवात केली. पुढे तेच नाव प्रचलित झाले.

नैसर्गिक आपत्तीमुळे कृष्णा नदीतील वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव खचला आहे. दगड निखळले आहेत. प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी मंदिराच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत. तसेच मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. - प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडriverनदीTempleमंदिर