शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

नात्यातील लग्नामुळे वाढतायत थॅलेसेमियाचे रुग्ण जिल्ह्यात ३०० जणांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:23 IST

थॅलेसेमियावर कायमस्वरूपी उपचार नाही; पण तरीही अनेकजण अंधश्रद्धा म्हणून चटके देऊन हा आजार बरा होतो, असा समज करून आहेत. परिणामी बालकांचे शारीरिक हाल होतात, त्यातून बरं वाटण्याचा उपायच शिल्लक राहत नाही. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात रुग्ण अधिक; जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डाची आवश्यकता

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : नात्यात केलेल्या लग्नामुळे थॅलेसेमिया रुग्णांचे प्रमाण वाढल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल ३०० रुग्णांची नोंद झाली असून, ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. या रुग्णांना तातडीने संसर्ग होत असल्याने जिल्हा रुग्णालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्डाची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे.

लग्न करताना एकच नाड असू नये, असा पूर्वीच्या लोकांचे म्हणणे होते. एकच नाड किंवा एकाच जनुकात जन्मलेल्यांचा विवाह झाला तर पुढं अपत्य जन्मावेळी किंवा जन्मानंतर काही क्लिष्टता निर्माण होण्याची शक्यता असते. याची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नात्यातील लग्न टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यातूनही हे लग्न झालेच तर गर्भधारणेनंतर योग्य वैद्यकीय तपासण्या करून बाळाची वाढ तपासणं आवश्यक असते; पण याविषयी पुरेशी माहिती नसल्याने थॅलेसेमियाग्रस्त बाळ जन्माला येते.

थॅलेसेमियावर कायमस्वरूपी उपचार नाही; पण तरीही अनेकजण अंधश्रद्धा म्हणून चटके देऊन हा आजार बरा होतो, असा समज करून आहेत. परिणामी बालकांचे शारीरिक हाल होतात, त्यातून बरं वाटण्याचा उपायच शिल्लक राहत नाही. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत.

 

  • काय आहे थॅलेसेमिया?

थॅलेसेमिया, हिमोफेलिया व सिकलसेल (अ‍ॅनेमिया) या रुग्णांच्या अंगात रक्त तयार होत नसल्यामुळे त्यांना जिवंत राहण्यासाठी दर २० दिवसांनी रक्त चढवावे लागते. या रुग्णांचे आर्युमान साधारण ३५ वर्षांचे असते. या कालावधीत सरासरी दीड हजार पिशव्या रक्त रुग्णाला चढवावे लागते.

  • असा ओळखावा हा आजार?

सामान्यपणे बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळ लाल चुटूक दिसते. थॅलेसेमिया असलेले बाळ जन्मत:च पांढरे शुभ्र दिसते. वजनाला कमी भरते आणि त्याच्या हालचालीही खूपच मंदावलेल्या असतात.

 

  • आजार टाळण्यासाठी हे करा

जवळच्या नात्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना होणारे बाळ हे थॅलेसेमियाग्रस्त असू शकते. अशावेळी गर्भधारणेनंतर तीन महिन्यांच्या आत संबंधितांनी ‘पॅलेमायनर’ तपासणी करणं आवश्यक आहे. या तपासणीत बाळाला तीव्र थॅलेसेमिया असल्याचे निष्पन्न झाल्यास गर्भपात करण्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.

  • दहा वर्षांच्या आतच उपचार

थॅलेसेमिया रुग्णांना त्यांच्या रक्तातातील म्हणजेच आई, वडील, बहीण, भाऊ यांचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं हा एकमेव उपचार आहे. मांडीपाशी असणाºया या बोन मॅरो जुळण्याची शक्यता अवघी २० टक्के आहे. तर त्यासाठी साधारण १५ ते २० लाख रुपयांचा खर्च येतो. ही शस्त्रक्रिया दहा वर्षांच्या आतच करावी लागते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ‘एचएलए’ ही तपासणी बंधनकारक असून त्यासाठीही मोठा खर्च असतो.

 

गर्भवती महिलांमध्ये थॅलेसेमियाविषयी जनजागृती करण्यासाठी आम्ही आशा वर्कर्सची मदत घेत आहोत. महिन्यातून एक बैठक घेऊन याविषयी मार्गदर्शन केले जाते. अल्प थॅलेसेमिया असणारे दोघे परस्परांशी विवाह करून निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात. पण तीव्र थॅलेसेमिया जोडप्यांचे बाळ अभावानेच निरोगी जन्माला येते.-धनंजय नामजोशी, थॅलेसेमिया निर्मूलन समिती कार्यवाह, कोल्हापूर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmedicinesऔषधं