शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

दहा एकरातील पीक गव्यांकडून उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:15 IST

सणबूर : शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून डोळ्यात तेल घालून राखण केलेल्या सुमारे दहा एकरातील गव्हासह ...

सणबूर : शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तब्बल दीड ते दोन महिन्यांपासून डोळ्यात तेल घालून राखण केलेल्या सुमारे दहा एकरातील गव्हासह अन्य पिकांचे शिवार गव्यांच्या कळपाने उद्ध्वस्त केले आहे. निवी (ता. पाटण) येथे घडलेल्या या घटनेने शेतकरी हतबल झाले आहेत.

सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील निवीसह लगतच्या अन्य गावांमध्ये वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतीसह पशुधन अडचणीत आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले असून, प्रतिवर्षी पडीक क्षेत्र वाढत आहे. काही शेतकरी एकत्र येऊन धाडसाने शेती करत असले तरी क्षणात होत्याचे नव्हते होत आहे. निवीतील दहा शेतकऱ्यांनाही दोन दिवसांपूर्वी रात्री असाच अनुभव आला. गावानजीक असलेल्या पट्टी नावाच्या शिवारात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दीड ते दोन महिन्यांपूर्वी गहू, कांदे, मका, वाटाणा, हरभरा आदी पिकांची लागवड केली. तसेच शेताभोवती चोहोबाजूंनी काटेरी कुंपण घातले. दररोज शेतकरी डोळ्यात तेल घालून शिवारात जागता पहारा देत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांना झोप लागली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. सर्व शेत गव्यांनी फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

विष्णू साबळे, तुकाराम साबळे, पांडुरंग साबळे, सदाशिव साबळे, शंकर साबळे, ईश्वर साबळे, झिंगूबाई साबळे, मारुती साबळे, सतीश साबळे आदी शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे.

- चौकट

वन विभागाकडून केवळ आश्वासन

जंगलालगत वसलेल्या निवी, कसणी व अन्य गावांना भेडसावणारा वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव रोखून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी वन विभागाने जंगलाच्या बाजूने सौरकुंपण घालावे किंवा चर काढावी, अशी मागणी वारंवार होत आहे. त्याबाबत वन विभागाकडूनही आश्वासन दिले जात आहे. मात्र, अद्याप कुंपण किंवा चर प्रत्यक्षात काढण्यात आलेला नाही. धोक्यात आलेली शेती आणि वाढते पडीक क्षेत्र हा त्याचाच परिणाम आहे.