शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

धुराडी पेटल्याने साखरवाडी गजबजली...! : ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:45 IST

नसीर शिकलगार । फलटण : थकीत देण्यामुळे बंद पडलेला आणि तोट्यात गेलेला साखरवाडी (ता. फलटण) येथील न्यू फलटण शुगर ...

ठळक मुद्दे ‘फलटण न्यू’चा दत्त इंडिया शुगरने घेतला ताबा

नसीर शिकलगार ।फलटण : थकीत देण्यामुळे बंद पडलेला आणि तोट्यात गेलेला साखरवाडी (ता. फलटण) येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. कारखाना बंद पडला होता. तो यंदा दत्त इंडिया शुगर प्रा. लि.ने ताब्यात घेऊन चालू केल्याने साखरवाडी परिसर गजबजला आहे. तालुक्यातील दिवाळखोरीत निघणारी मोठी संस्था वाचून ऊस उत्पादकांचे थकीत पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक व कामगारांना दिलासा मिळाला आहे.

फलटण तालुक्यात साखरवाडीमध्ये सन १९३२ च्या दरम्यान सुरू झालेला न्यू फलटण शुगर साखर कारखाना चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे कोट्यवधींची कर्जे डोक्यावर घेऊन बंद पडला. गतवर्षीच्या हंगामात गाळप होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोट्यवधींची देणी आणि सुमारे ५४५ कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. कॉसमॉस को-आॅप. बँकेने थकबाकीची मागणी केल्यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलमध्ये दि. २० फेब्रुवारी २०१९ रोजी न्यू फलटण कारखाना हस्तांतराबाबत कार्यवाही सुरू झाली.

कॉसमॉसने दोन-तीन वर्षांपूर्वी २५ कोटी रुपये कारखान्याला दिले होते. त्यापैकी १२ कोटी येणे असल्याचे तसेच स्टेट बँक, आयडीबीआय व अन्य बँकांची मोठी देणी असल्याने एनसीएलटी तोडग्यासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ४९ कोटी आणि कामगारांचे १५-१६ महिन्यांचे पगार व अन्य येणी प्राधान्याने मिळाली पाहिजेत, यासाठी आग्रह धरला.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इसेन्शियल कम्युडीटी कायद्यातील तरतुदीनुसार उच्च न्यायालयात शेतकरी/कामगारांची थकीत येणी मिळण्यासाठी दावा दाखल केला. यावर एनसीएलटीने फलटण न्यू शुगर कारखान दत्त इंडिया शुगर प्रा. लि.ला हस्तांतरित केला. तसेच त्यांना ऊसबिलाची मागणी करण्यासाठी अर्ज भरून दिलेल्या ऊसउत्पादकांचे पैसे देण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे (एनसीएलटी) च्या माध्यमातून श्री दत्त इंडिया प्रा. लि., मुंबई यांनी न्यू फलटण शुगरची जबाबदारी स्वीकारली असून, शेतकरी व कामगारांची देणी देण्यासह यावर्षीच्या गळीत हंगामात कारखाना सुरू करण्याची तयारी त्यांनी केली होती. सूत्रे हाती येताच अवघ्या १५ दिवसांत गाळपास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, कामगारांना अ‍ॅडव्हान्स पगार देण्यात आला आहे.

दत्त इंडियाने पहिल्या टप्प्यात १४ कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याने कंगाल होत चाललेल्या ऊस उत्पादकाला दोन वर्षांनी पैसे मिळाले आहेत. तो अडचणीतून बाहेर येऊ लागला आहे. तसेच साखरवाडीतील साखर कारखाना सुरू झाल्याने परिसरात वर्दळही वाढू लागली असून, वर्षभर हाताला काम आणि पगार नसलेला कामगारवर्गही उत्साहात काम करू लागला आहे. त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

साखरवाडी, ता. फलटण येथील साखर कारखाना दत्त इंडिया शुगर प्रा. लि. कंपनीने चालविण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात उसाचे गाळप सुरू झाले आहे.

दत्त इंडियाने आतापर्यंत एनसीएलटीच्या आदेशाप्रमाणे १४ कोटी रुपये मागील काही ऊस उत्पादकांची देणी दिली आहेत. ज्याप्रमाणे आदेश येईल, त्याप्रमाणे पेमेंट करू, या हंगामात इतर कारखाने जो दर देतील, त्या प्रमाणात दर देण्याचा प्रयत्न करू. आत्तापर्यंत १३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, हळूहळू उसाचे प्रमाण वाढल्यावर गाळपही वाढेल.- मृत्युंजय शिंदे उपाध्यक्ष,दत्त इंडिया शुगर, साखरवाडीआम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचे आणि कामगारांचे थकीत बिल मिळावे म्हणून मोठा लढा उभारला आहे. न्यायालयातही दाद मागितली आहे. आता दत्त इंडियाने बंद पडलेला हा कारखाना सुरू केला असला तरी ऊस उत्पादक आणि कामगारांची सर्व देणी लवकर द्यावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- नितीन यादवफलटण तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने