शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

विद्यार्थ्यांची कोंडी : शुल्क वसुलीसाठी खासगी शाळांचा छुपा अजेंडा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:12 AM

बेताची आर्थिक स्थिती असलेले पालक तीन महिन्यांची फी एकत्र भरण्याचा पर्याय निवडतात. सध्या नोकरीच्या ठिकाणी पगारांमध्ये झालेली कपात लक्षात घेता पालकांना ही फी भरणं शक्य नाही.

ठळक मुद्देआॅनलाईन वर्गात फी भरणाऱ्यांनाच मिळतोय प्रवेश

सातारा : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांसह स्थानिक प्रशासनानेही खासगी शिक्षण संस्थांनी पालकांना फीची सक्ती न करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही अनेक शाळांत फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घेतलेच नाही. उलट शुल्क वसुलीसाठी खासगी शाळांनी सुरू केलेल्या या छुप्या अजेंड्यामुळे पालक  मात्र, चांगलेच त्रस्त झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच मे महिन्यात सर्वांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात ढकलण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा आणि पालकांनी फी भरण्याचा काही प्रश्नच उद्भवला नाही. बहुतांश पालक वर्षाची फी दोन टप्प्यांमध्ये भरण्याला प्राधान्य देतात. शाळा सुरू झाल्यानंतर आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर फी भरण्यात येते. मात्र, बेताची आर्थिक स्थिती असलेले पालक तीन महिन्यांची फी एकत्र भरण्याचा पर्याय निवडतात. सध्या नोकरीच्या ठिकाणी पगारांमध्ये झालेली कपात लक्षात घेता पालकांना ही फी भरणं शक्य नाही.

सध्या नववीच्या वर्गातून दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. यासाठी अनेक शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा तुकडी निहाय व्हॉटसअ‍ॅप ग्रुप सुरू केला आहे. नियमितमपणे या ग्रुपवर अध्यापनाबरोबरच गृहपाठही दिला जातो. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्याची पूर्ण फी भरली आहे, त्यांनाच या ग्रुपमध्ये घेण्यात आले आहे. फी पूर्ण न भरल्याने तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला नाही, असं कारण सांगून खासगी शाळांनी वसुलीच्या नावाखाली विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करण्याचेच धोरण अवलंबले आहे.

मुठभर शाळांनी राबविलेल्या या धोरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात गढूळ वातावरण होऊ लागलं आहे. कोणत्याही पालकाला खिशात पैसे असताना आपल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान करून काहीच मिळणार नाही, याची जाणीव शाळा प्रशासनाने ठेवण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होऊ लागलीय. तर कोरोनाच्या संकटात आपल्या पाल्याला शिक्षण देणारी संस्थाही आर्थिक अडचणीत सापडू नये, यासाठी पालकांचाही पाठिंबा शाळेला आवश्यक आहे.मुलं शाळेतच नाहीत तर फी कशाची भरायची ?

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या भितीने पालकांनी मुलांना शाळेतच पाठविले नाही. त्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्व शाळा बंदच ठेवण्यात आल्या. लॉकडाऊन वाढला आणि विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याच्या आशा संपूर्णपणे मावळल्या. परीक्षा रद्दच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याचा प्रश्नच नाही. मुलं शाळेत गेलीच नाहीत तर फी कशाची भरायची असा सवाल पालक करतायत.

शाळा बंद तरीही शिक्षकांचे पगार सुरूच..!मार्च महिन्यापासून विद्यार्थी शाळेत आले नाहीत, पण विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन आणि व्हॉटसअ‍ॅपवरून अभ्यास दिला जात होता. मुलं शाळेत नसलीतरीही शासन आदेशानुसार शिक्षक नियमितपणे आॅनलाईन अध्यापनाचे काम करत होते. ज्याप्रकारे फीची सक्ती नको, असे शासन सांगत होते. तसेच कोणाच्याही पगारात कपात नको, असंही शासनाने कळवलंय. शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार नियमित सुरू असल्याचे शाळांचे म्हणणे आहे.

 

शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या या काळात फीमध्ये वाढ तसेच सक्तीने वसुली करु नये अशी सूचना शाळांना यापूर्वी लेखी पत्राद्वारे केली आहे. मुख्याध्यापकांबरोबर झालेल्या आॅनलाईन बैठकीतही याविषयी सांगण्यात आले आहे. तरीही असा काही प्रकार घडत असेल तर गैर आहे. याबाबत संबंधित पालकांनी खासगीत लेखी तक्रार केली तर संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल.- राजेश क्षीरसागरमाध्यमिक शिक्षणाधिकारी 

टॅग्स :SchoolशाळाonlineऑनलाइनMONEYपैसाStudentविद्यार्थी