शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीतील सर्वांचाच ‘सवता सुभा’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ६५० हून अधिक ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ६५० हून अधिक ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी सवता सुभा मांडला आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी हे सर्वजण एकमेकांच्याच विरोधात लढणार आहेत तर भाजपही तयारीत आहे. या निवडणुकीची चुरस जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांत आहे.

जिल्ह्यात १४९० हून अधिक ग्रामपंचायती आहेत. त्यामधील डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ८७८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. जवळपास ६० टक्के ग्रामपंचायतींची निवडणूक एकाचवेळी होत असल्याने सर्वच पक्ष ताकदीनिशी उतरलेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. अनेक संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या ताब्यात आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असलेतरी जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे आघाडीतील एकीचे वारेच वाहिले नाहीत.

जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींपैकी १२३ ठिकाणची निवडणूक पूर्णत: बिनविरोध आहे तर ९८ ग्रामपंचायतींची निवडणूक अंशत: बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे ६५४ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे तर काही ठिकाणी तिरंगी सामना रंगत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बहुतांशी ठिकाणी स्वतंत्र लढत आहेत. अपवादात्मक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली आहे. शिवसेनाही स्थानिक गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलीय तर भाजपही अनेक ठिकाणी अस्तित्व दाखवत आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे.

पाटण तालुक्यात नेहमीप्रमाणे पाटणकर विरोधात देसाई गटातच राजकीय द्वंद्व आहे. दोन्ही गटांत नेहमीच काँटे की टक्कर होते. आताही ही निवडणूक चुरशीची होईल तर काँग्रेस आणि भाजपही कमी ठिकाणी रिंगणात आहे. माण तालुक्यात ९० टक्के ठिकाणी दुरंगीच सामना होईल. स्थानिक पातळीवरील गटात ही निवडणूक होत आहे. तालुक्यात महाविकास आघाडीचे वारे नाही. कोरेगाव तालुक्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप रिंगणात आहेत. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत समोरासमोर सामना आहे.

खंडाळा तालुक्यात बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात इतर पक्ष एकत्र आले आहेत. भाजप आणि शिवसेनाही मैदानात आहे. तालुक्यात महाविकास आघाडी नाही. फलटणमध्ये राजे विरोधात खासदार गट अशीच निवडणूक होत आहे. पण, राजे गटाची ताकद अधिक आहे. खटाव तालुक्यात बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत आहे. तर मोठ्या काही गावांच्या ठिकाणी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी अशी लढत आहे. भाजप आणि शिवसेनाही काही ठिकाणी गटातून निवडणूक लढवत आहे.

सातारा तालुक्यात राजे गटाचीच चलती राहणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींची निवडणूक सातारा तालुक्यातच होत आहे. कऱ्हाड तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच अधिक करून सामना आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. जावळी तालुक्यात काही ठिकाणी बिनविरोध निवड झाली असलीतरी अटीतटीचा सामना आहे. महाबळेश्वरमध्येही दुरंगी लढत होत आहे.

चौकट :

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र

निवडणूक लागलेली ग्रामपंचायत संख्या - ८७८

पूर्णता बनिविरोध झालेल्या ग्रामपंचायती - १२३

अंशत: बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या - ९८

ग्रामपंचायतींसाठी निवडून जाणारे सदस्य - ७२६६

बिनविरोध निवडून आलेली सदस्यसंख्या - २६३१

प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायत संख्या तालुकानिहाय...

सातारा तालुका ९०, कऱ्हाड ८७, पाटण ७२, कोरेगाव ४९, वाई ५७, खंडाळा ५०, महाबळेश्वर १२, फलटण तालुका ७४, जावळी ३७, माण ४७ आणि खटाव तालुका ७७.

.............................................................