शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याने ४१ अंशाचा टप्पाही पार केला; माण तालुक्यात उष्माघाताचा बळी

By नितीन काळेल | Updated: April 16, 2026 22:07 IST

Satara Heat Wave news: दोन वर्षांतील उच्चांकी तापमान : जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम; कमाल तापमान ४० अंशावरच...

- नितीन काळेललोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून मागील पाच दिवसांपासून बहुतांशी भागाचा पारा ४० अंशावर कायम आहे. तर सातारा शहरातील कमाल तापमानाने ४१ अंशाचा टप्पाही पार केला. गुरूवारी ४१.२ अंशाची नोंद झाली. हे मागील दोन वर्षांतील उच्चांकी तापमान ठरले आहे. तर माण, खटाव तालुक्यातील पारा ४३ अंशाच्या घरात गेला आहे. तसेच माण तालुक्यात गुरूवारी एका शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली होती. मार्च महिन्यातही कमाल तापमान ३८ अंशावर गेले होते. तर एप्रिल महिना मागील काही वर्षातील कडक उन्हाळ्याचा ठरला आहे. कारण, एप्रिलच्या मध्यावरच पारा ४० अंशावर पोहोचला. तसेच दररोजच कमाल तापमानात वाढ होत चालली आहे. सातारा शहराचे तापमान एप्रिल महिन्याच्या शेवटात किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ४१ अंशापर्यंत जाते. पण, यंदा एप्रिलच एकदम ‘हाॅट’ ठरला आहे. मागील पाच दिवसांत जिल्ह्याच्या बहुतांशी भागाचा पारा ४० अंशावर कायम आहे. सातारा शहरात तर १२ एप्रिलपासून ४० अंशावर कमाल तापमान आहे. गुरूवारी तर सातारा शहरात ४१.२ अंशाची नोंद झाली. यामुळे उष्णतेची लाट तीव्र होताना दिसून येत आहे.

शेळ्या राखण्यासाठी गेल्यावर चक्कर अन् मृत्यू...

माण तालुक्यातील पारा ४३ अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. त्यातच कडक ऊन असतानाही शेतकरी दुपारीही काम करतात. तसेच उन्हातच पशुधनाची राखण करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशातच माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील शेतकरी हणुमंत काशीनाथ चव्हाण (वय ७०) यांचा उष्माघाताने बळी गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चव्हाण हे गुरूवारी सकाळी शेतात शेळ्या राखण्यासाठी गेले होते. त्यावेळी थकवा जाणवल्याने झाडाखाली बसले. पण, चक्कर येऊन ते जमिनीवर पडले. नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण, डाॅक्टरांनी तपासणीनंतर मृत झाल्याचे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Scorches Past 41 Degrees; Heatstroke Claim in Man Taluka

Web Summary : Satara experiences extreme heatwave, reaching 41.2 degrees, a two-year high. Man Taluka records 43 degrees, with a farmer suspected to have died from heatstroke while tending goats.
टॅग्स :Heat Strokeउष्माघात