शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

'उदयनराजेंना बिनविरोध अन् माझा पराभव, हे राजकारण न कळण्याइतका मी दुधखुळा नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 9:22 AM

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला.

सातारा: नुकतीच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक (Satara District Bank Election) पार पडली. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे(MLA Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. जावळी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी शिंदेंचा एक मताने पराभव केला. या पराभवावरुन आमदार शिंदे चांगलेच नाराज असल्याचे पाहायला मिळतंय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 100 टक्के राजकारण झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते माझ्या पराभवाला जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप शिंदे यांनी केला आहे.

हे शिवेंद्रराजेंचे षडयंत्र आहेनिकालानंतर काल(गुरुवार) आमदार शिंदे माध्यमांसमोर आले आणि निकालावर आपली प्रतिक्रिया दिली. 'आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यामुळे माझा पराभव झाला, हे त्यांचेच षडयंत्र होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच, ज्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा विरोध केला जात होता, मग त्यांना पॅनलमध्ये कसे घेतले, अचानक काय घडलं की महाराष्ट्रातील इतर कोणत्या नेत्याची जादूची कांडी फिरवली गेली आणि उदयनराजेंना बिनविरोध करावं लागलं ? असा सवाही त्यांनी केला.

...इतका दूधखुळा नाहीते पुढे म्हणाले, एका बाजूला तुम्ही सगळे एकत्र येऊन ज्यांच्याशी तुमचे वाद आहेत, त्यांना बिनविरोध करता आणि दुसऱ्या बाजूला पाच वर्ष तुमच्यासोबत चांगलं काम करणाऱ्याचा तुम्ही पराभव करता. हे राजकारण न कळण्याइतका मी दूधखुळा नाही. मात्र, फसवून पाडण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचंच आहे, असंही ते म्हणाले. 

जयंत पाटील काय म्हणाले ?शशिकांत शिंदेंनी केलेल्या आरोपाबाबत जयंत पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर पाटील म्हणाले की, शिंदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे, त्यांची भेट झाल्यानंतर मी त्याबाबत अधिक बोलू शकेल. त्यांचे म्हणने जाणून घेईन, असं मत जयंत पाटील म्हणाले. तसेच, राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे, प्रत्येक पक्षाला कुणासोबत आघाडी करायची ते ठरवण्याचा अधिकार आहे, असंही त्यांनी नमूद केलं. 

निवडणूक शिंदेंनी गांभीर्याने घ्यायला हवी होतीसातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण, त्यांनी ही निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं पवार म्हणाले. तसिच, निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यातील कार्यालयावर दगडफेक झाली, ही घटना खूपच दुर्दैवी आहे, असंही पवार म्हणाले.

 

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदेsatara-pcसाताराNCPराष्ट्रवादी काँग्रेसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले