शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : आरोग्य सांभाळा...!

By admin | Updated: September 20, 2014 00:34 IST

तापाचे रुग्ण वाढले : दवाखाने झाले फुल्ल

सातारा : सप्टेंबर महिन्यात गणपतीच्या आगमनापासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली होती. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी झाला. मात्र, अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम सातारकरांच्या आरोग्यावर झालेला दिसून आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तापाचे अनेक रुग्ण आढळून आले, यात प्रामुख्याने लहानग्यांची संख्या अधिक आहे.गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पावसाची संततधार सुरू झाली होती. ऊन, पाऊस आणि गारठा अशा तिन्ही ऋतूंचे टप्पे एका दिवसातच अनुभवायला मिळत होते. सकाळी ऊन, दिवसा पाऊस आणि रात्री थंडी अशा विचित्र वातावरणामुळे गेल्या काही दिवसांत आजारी पडणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली होती. सकाळी ठणठणीत बरे असणारेही दुपारी आडवे होत असल्याचे चित्र अनेक घरांमध्ये दिसत होते. घरातील छोट्यांची तर यापेक्षा वाईट अवस्था होती. दिवसभर आपल्या बाललीलांनी अवघे घर डोक्यावर घेणारे चिमुकलेही चिडीचूप झाले होते. तापाने फणफणलेल्या या चिमुकल्यांचा रडवेला चेहरा कुटुंबीयांना क्लेशकारक वाटत होता. घरातील प्रत्येकाला सूचना देऊन देऊन बेजार करणारे ज्येष्ठही अंथरूणाला खिळले आहेत. सकाळी लवकर उठून सर्वांना सूचना देत अवघ्या कुटुंबाला एका रेषेत चालायला लावणारे हे शेर ढेर झाले होते. ज्येष्ठांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना या आजाराचा सर्वाधिक त्रास झाला. सहसा कोणाचेही न ऐकणारे ज्येष्ठ वैद्यकीय सल्ल्याचे तंतोतंत पालन करून लवकर बरे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घरातील या आजारमय वातावरणामुळे अवघे कुटुंब त्रासून गेले आहे. (प्रतिनिधी)स्थानिक प्रशासनाच्या उपाययोजनापावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून फवारणी करण्यात येते. यावर्षी पालिका आणि ग्रामपंचायत भागांमध्ये ही फवारणी झाली. ग्रामीण भागात ज्यांना बंदिस्त पाईपमधून पाणी मिळत नाही, अशा सर्वांना ‘मेडिक्लोर’चे मोफत वाटप करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही तापामुळे आजारी असलेल्या बालकांवर तातडीने उपचार करून त्यांना घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.ग्रुग्णालय झाली हाऊसफुल्ल!ोल्या काही दिवसांपासून तापाची साथ चांगलीच वाढली आहे. त्यामुळे अबाल वृद्धांची गर्दी दवाखान्यात झाली आहे. शहरातील काही नामांकित रुग्णालयांनी तर चक्क जागा नाही म्हणून रुग्णांना अन्य दवाखान्यात जाण्याचे सल्ले दिले. तर काही रुग्णालयांनी दोन खाटांच्यामध्ये गादी टाकून रुग्णांवर उपचार केले. सकाळी लवकर नंबर लावाला तरच दुपारी नंबर येतो. त्यामुळे आजारी रुग्णांचे नातेवाईक फोनवरुनच डॉक्टरांची अपार्इंटमेंट घेताना पाहायला मिळत आहेत. १कधी नव्हे इतका पाऊस यावर्षी सातारकरांनी अनुभवला. त्यामुळे अनेक आजार मोठ्या प्रमाणावर पसरले जातात. या दिवसांत अशुध्द पाण्यामुळेही रोगराई पसरण्याची भीती असते. म्हणून पाणी उकळून पिणे आणि बाहेरील उघड्यावरील अन्न खाणे टाळले पाहिजे.- डॉ. अच्युत गोडबोले२पावसाळ्याच्या दिवसांत मुलांना खूप भूक लागते. वातावरणात बदल होत असल्यामुळे या बदलाबरोबर पुढे जाताना मुलांच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळेही मुले या दिवसात आजारी पडतात.- डॉ़ स्वाती श्रोत्री ३दमट वातावरण आणि पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा आजार होतो. त्यामुळे शक्यतो घरातील वातावरण कोरडे राहील, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या सवयीचा अवलंब होणे आवश्यक आहे. - डॉ. विकास जाधव