शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ताच बनला बाजाराचा तळ, वाहतुकीचा होतोय घोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

खंडाळा : भाजी विक्रेत्यांसाठी खंडाळा शहरात प्रशस्त मंडई असताना अनेक शेतकऱ्यांचा आठवडी बाजार नव्हे तर दैनंदिन मंडईही रस्त्यावरच भरत ...

खंडाळा : भाजी विक्रेत्यांसाठी खंडाळा शहरात प्रशस्त मंडई असताना अनेक शेतकऱ्यांचा आठवडी बाजार नव्हे तर दैनंदिन मंडईही रस्त्यावरच भरत आहे. रस्त्यावरील हा बाजार आता वाहनधारकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढवू लागला आहे. त्यामुळे जागेअभावी रस्ताच बाजारतळ बनला असून त्यामुळे वाहतुकीचा मोठा घोळ होत आहे.

इतर शहरांच्या तुलनेत खंडाळ्याची बाजारपेठ सर्वात लहान आहे; परंतु परिसरातील लोकांना एवढेच व्यापारी ठिकाण असल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांची या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी सतत रेलचेल सुरू असते. नागरिकांच्या सेवेसाठी नगरपंचायतीने शहरात छोटेखानी भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे; परंतु जागा अपुरी पडत असल्याने बाजारा दिवशी व इतर वेळी रस्त्यावर निर्धास्तपणे भाजी विक्री करणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. आठवडी बाजारात अनेक विक्रेते छत्रपती शिवाजी चौक ते जिल्हा बँकेपर्यंत या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्री करतात. तसेच इतर दिवशीही मंडईत गजबजाट असतो. रस्त्यावर भाजी विक्री केली जात असल्याने शहरातील रस्ते भाजी विक्रेत्यांसाठी आहेत की वाहतुकीसाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. मुळातच शहरातील रस्ते अरुंद असल्याने दळणवळणास अडथळा येतो. त्यामुळे रस्त्यावर एसटी बससह इतर वाहनांची वाहतूक बंद राहते. त्यामुळे आता प्रशासनही हतबल झाले आहे.

चौकट..

म्हणे ग्राहकच येत नाही

ग्राहकांना रस्त्यावरून भाजी खरेदी करणे सोयीचे पडते. एका ठिकाणी गाडी लावून मंडईत चालत जाणे व भाजी खरेदी करणे अनेकांना वेळखाऊ वाटते. त्यामुळे अनेकजण येता-जाता भाजी खरेदी करतात. तर बाजाराची व मंडईची जागा बदलल्यास ग्राहक फिरकत नसल्याने धंदा होत नाही. त्यामुळे रस्त्यावर बसून भाजी विक्री करण्याखेरीज दुसरा पर्यायच नाही, अशी धारणा भाजीविक्रेत्यांची झाली आहे.

चौकट..

या ठिकाणी होऊ शकते व्यवस्था

खंडाळ्यात आठवडी बाजारासाठी बाजार समितीच्या मैदानातही पुनर्वसन होऊ शकते. मात्र त्यासाठी नगरपंचायत आणि बाजार समिती यांचा समन्वय होणे गरजेचे आहे. याबाबतची योग्य रचना करून कार्यवाही व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. ........................................