शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वडीच्या शेतकऱ्याने घेतले आल्याचे विक्रमी उत्पादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औंध : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील वडी येथील शेतकऱ्याने आपल्या ५० गुंठे क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औंध : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील वडी येथील शेतकऱ्याने आपल्या ५० गुंठे क्षेत्रात ५१ टन म्हणजे आले पिकाच्या बागेत १०२ गाडी एवढे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या विक्रमी उत्पादनाची परिसरात चर्चा सुरू आहे.

वडी येथील वसंत रामचंद्र यादव यांनी १० मे २०२० रोजी ५० गुंठे क्षेत्रात आल्याची लागण केली. ५० गुंठ्यांत त्यांनी १५ ट्रेलर शेणखत, १६ टन मळी टाकली. उन्हाळ्यात नांगरट करून रोटर मारून बेड सोडले. त्यानंतर डबल रोटर मारून बेड सोडून ठिबक व्यवस्थापन वापरून साडेचार फूट सरी सोडून लागण केली. वेळोवेळी कृषिधन ॲग्रोचे सुधीर सुरेश कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली आले पिकाची योग्य देखभाल केली. सुयोग्य नियोजनाने वेळोवेळी पिकाची मशागत, मेहनत करून मोठ्या जिद्दीने पीक आणले. कमी पाणी व सूक्ष्म नियोजन करून दुष्काळी परिस्थितीशी तोंड देऊन त्यांनी आणलेल्या पिकाचे उत्पादन पाहण्यासाठी या भागातील लोकांनी भेटी दिल्या आहेत. सद्य:स्थितीत दर कमी असूनही त्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट पैसे मिळाले आणि विशेष म्हणजे चार महिने अगोदरच पीक काढूनही त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले. वडी येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी दिल्या जाणाऱ्या शेतीरत्न पुरस्काराचे वसंत यादव मानकरी ठरले आहेत.

कोट..

आले पीक व्यवस्थापनात वेळेला खूप महत्त्व आहे. कोणत्याही गोष्टीत म्हणजे भांगलण, औषध, खत, कीटकनाशके, पाणी हे योग्य वेळेतच केले पाहिजे. त्यामुळेच भरघोस उत्पन्न निघाले तसेच वेळोवेळी सुधीर कणसे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

-वसंत यादव, शेतकरी वडी

प्रतिक्रिया २)

माझ्या सल्ल्यानुसार आले पिकावर योग्यवेळी वसंत यादव यांनी पिकाची देखभाल केल्याने चांगले उत्पन्न मिळाले. अनेकवेळा त्यांच्या प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.

- सुधीर कणसे, कृषिधन ॲग्रो, पुसेसावळी.

२३औंध

फोटो:-खटाव तालुक्यातील वडी येथील वसंत यादव यांचे आल्याचे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (छाया: रशिद शेख)