शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

भाग गेला... शीण गेला; अवघा झाला आनंद!

By admin | Updated: July 20, 2015 00:05 IST

पंढरीच्या वाटेवर : लेकुरवाळ्या विठोबाचे दर्शन आले समीप

जगदीश कोष्टी ल्ल साताराआनंदाचे डोही, आनंद तरंगआनंदाचे अंग, आनंदाने...पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरी, कंबरेवर हात ठेवून विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून संतांच्या दिंड्या मार्गक्रमण करत आहेत. यामध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी हे विठोबाचीच लेकरे आहेत. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना वय विसरून फुगडी खेळणे, वडाच्या पारंब्यांना लटकण्याचा खेळ ते खेळत आहेत.सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला निघाली आहे. या दिंडीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होत आहेत. दिंडीत सहभागी होणारे नव्वद टक्के वारकरी हे शेतकरी, शेतमजूर कष्टकरी आहेत. यंदा राज्यभर पावसाने पाठ फिरविली असल्याने शेतातही फारशी कामे नसल्याने ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.माउलींचा हा पालखी सोहळा १२० किलोमीटरचा प्रवास करून फलटणनगरीत दाखल झाला असून, आणखी ११० किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. दररोज सरासरी वीस किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना मुखात ‘विठू’ नामाचा जयघोष असल्याने कसलाही कंटाळा जाणवत नाही. ‘भाग गेला... शीण गेला अवघा झाला आनंद,’ अशीच अवस्था त्यांच्या मनाची झालेली असते. त्यामुळे कितीही प्रवास केला तरी ते आनंदी असतात.पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळाचे सावट आहे. घरी कुटुंब आहे. या असलेल्या चिंता घरात ठेवून वारीत दाखल झालेले वारकरी वय, जात, धर्म, लिंग विसरून आनंद साजरा करत आहेत. फुगडी, सुरपारंब्या, झोका खेळण्यात मग्न असतात. वारीच्या मार्गावरही फलटण तालुक्यात हेच चित्र पाहायला मिळत आहे. भाग गेला... शीण गेला; अवघा झाला आनंद!पंढरीच्या वाटेवर : लेकुरवाळ्या विठोबाचे दर्शन आले समीपजगदीश कोष्टी ल्ल साताराआनंदाचे डोही, आनंद तरंगआनंदाचे अंग, आनंदाने...पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरी, कंबरेवर हात ठेवून विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून संतांच्या दिंड्या मार्गक्रमण करत आहेत. यामध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी हे विठोबाचीच लेकरे आहेत. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना वय विसरून फुगडी खेळणे, वडाच्या पारंब्यांना लटकण्याचा खेळ ते खेळत आहेत.सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला निघाली आहे. या दिंडीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून लहान-मोठ्या दिंड्या सहभागी होत आहेत. दिंडीत सहभागी होणारे नव्वद टक्के वारकरी हे शेतकरी, शेतमजूर कष्टकरी आहेत. यंदा राज्यभर पावसाने पाठ फिरविली असल्याने शेतातही फारशी कामे नसल्याने ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.माउलींचा हा पालखी सोहळा १२० किलोमीटरचा प्रवास करून फलटणनगरीत दाखल झाला असून, आणखी ११० किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. दररोज सरासरी वीस किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना मुखात ‘विठू’ नामाचा जयघोष असल्याने कसलाही कंटाळा जाणवत नाही. ‘भाग गेला... शीण गेला अवघा झाला आनंद,’ अशीच अवस्था त्यांच्या मनाची झालेली असते. त्यामुळे कितीही प्रवास केला तरी ते आनंदी असतात.पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळाचे सावट आहे. घरी कुटुंब आहे. या असलेल्या चिंता घरात ठेवून वारीत दाखल झालेले वारकरी वय, जात, धर्म, लिंग विसरून आनंद साजरा करत आहेत. फुगडी, सुरपारंब्या, झोका खेळण्यात मग्न असतात. वारीच्या मार्गावरही फलटण तालुक्यात हेच चित्र पाहायला मिळत आहे. वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी वय, लिंग, वर्ण, जात, धर्म विसरून विविध खेळ खळत असतात. हा खेळ पाहत असतानाच काहीना आनंद वाटत असतो. यामध्ये मानवी मनोरे करून त्यावर मृदंग वाजवणे, संगीत खुर्ची, महिला फेर धरून झिम्मा फुगडी आदी खेळ खेळत असतात. त्याचप्रमाणे भारुडामध्ये चालू घडामोडीवरही बोट ठेवले जात असल्याने भारुड ऐकण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ गर्दी करत असतात.माउलींची पालखी आज बरड मुक्कामी४वाठार निंबाळकर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी बरड, ता. फलटण ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. माउलींची पालखी सोमवारी (दि. २०) रोजी बरड मुक्कामी आहे. यानिमित्त पालखी तळाजवळील तसेच जिथे दिंड्या व वारकरी मुक्काम करतात अशा जागांची स्वच्छता करुन औषध फवारणी करुन पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.४पंचायत समितीच्या वतीने पाणी टँकर, टँकर भरण्याचे फिडर, पालखी तळ व परिसरात फिरती औषध, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, स्वच्छतागृह, मोबाईल टॉयलेट आदींची सुविधा करण्यात आली आहे.४तसेच महसूल विभागाच्या वतीने पालखी मुक्काम ठिकाणी पुरेसा रॉकेल साठा, धान्य, गॅस टाक्या आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.४फलटण तालुक्यातील तिसरा व सातारा जिल्ह्यातील पाचवा मुक्काम असून, सातारा जिल्ह्यातील व फलटण तालुक्यातील अखेरचा मुक्काम आहे.४बरड गावचा मुक्काम आटपून पालखी सोहळा मंगळवारी (दि. २१) सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.तरुणांनी केला माउलींचा मार्ग सुकरआदर्की : संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात स्वागत होताच सातारा-लोणंद व वाठारस्टेशन-फलटण मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने हिंगणगाव मार्गे वाहतूक सुरू होते; परंतु या मार्गावर मार्गदर्शक फलक नसल्याने वाहनधारक, भाविकांची फसगत होते. ही फसगत टाळण्यासाठी हिंगणगाव येथील तरुणांनी मुख्य चौकात मार्गदर्शक फलक लावल्याने भाविकांचा मार्ग सुकर झाला आहे.हिंगणगाव येथून आदर्की-हिंगणगाव-लोणंद-आदर्की, हिंगणगाव-सासवड-मरडगाव, आदर्की-हिंगणगाव-सालपे-लोणंद, आदर्की-हिंगणगाव-कापशी असे चार मार्ग जातात. मात्र, मार्गदर्शक फलक नसल्याने वाहने मार्ग चुकतात. यावर उपाय म्हणून यावर्षी हिंगणगाव येथील तरुणांनी आझाद चौक येथे पालखी सोहळ्याकडे व गावांच्या नावाचे फलक लावल्याने भाविकांचा मार्ग सुकर झाला आहे. (वार्ताहर)