शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रामराजे,पवारांकडून सभापतिपदाचा अवमान !

By admin | Updated: April 8, 2015 00:32 IST

उदयनराजे : जिल्हा बँंकेसाठी अर्ज दाखल करताना दोन्ही नेत्यांवर ओढले कोरडे

सातारा : ‘अनेक वर्षे डबक्यात राहिलेल्या बेडकाला समुद्रात पोहण्याची संधी मिळाली तरी त्या बेडकाला डबकंच आवडतं. त्याप्रमाणं रामराजेंचे झाले आहे. ते राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती असतानाही त्यांना त्या पदाचे संकेत नीट समजलेले नाहीत. त्यांनी हे संकेत पायदळी तुडवून माझ्यावर खालच्या पातळीवर जावून टीका केली. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही रामराजेंना पोरकट ठरवले आहे. या दोघांनीही विधानपरिषद सभापतीपदाचा अवमान केला आहे,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात केली. दरम्यान, यावेळी त्यांनी समर्थकांसोबत गृहनिर्माण व डेअरी मतदारसंघातून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांसोबत जिल्हा बँकेतील निवडणूक कार्यालयात येऊन आपला निवडणूक अर्ज दाखल केला. त्याआधी त्यांनी बँकेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी कवठेमहांकाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात रामराजे व उदयनराजे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा पोरकटपणा बंद करावा, असा सल्ला दिला होता. याबाबत उदयनराजेंना पत्रकारांनी छेडले असता उदयनराजे म्हणाले, ‘राज्याच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदाचा मान सातारा जिल्ह्याला मिळाल्याने मला आनंद झाला. मात्र, सभापती झाल्यावर रामरावांनी जी विधाने केली त्यावरुन शरद पवारांची ही निवड चुकली, असंच खेदानं म्हणावं लागतंय. जिथं पोक्त व ज्ञानी लोक बसलेले असतात, त्या सभागृहाचे सभापतीपद भूषविणाऱ्या व्यक्तिकडून त्या पदाचे संकेत पाळण्याची अपेक्षा असते. पण रामरावांनी माझ्यावर व आमच्या घराण्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब असून शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा.’सुरुवातीला अजित पवारांचा सल्ला हा रामराजेंना होता, असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले; परंतु पत्रकारांनी हा सल्ला देताना पवारांनी तुमचेही नाव घेतले होते, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर उदयनराजे म्हणाले, ‘अजित पवार हे माझ्या अत्यंत जवळचे आहेत. आमच्या राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, अजित पवार हे खालच्या सभागृहाचे म्हणजे विधानसभेचे सदस्य आहेत. तर रामराजे वरच्या सभागृहाचे ‘मानकरी’ आहेत. अत्यंत ज्ञानी अशा सभागृहाच्या सभापतीला पोरकट म्हणून अजित पवारांनी या पदाचा अवमान केला आहे. मला काही कायदेतज्ञांनी सांगितलं की या गोष्टीचा निषेध व्हायला हवा. मात्र, याचा निषेध संबंधित सभागृहाच्या सदस्यांनी करायला हवा होता.’ असं म्हणत उदयनराजेंनी एकाचवेळी रामराजे आणि अजित पवार या दोघांवरही निशाणा साधला. (प्रतिनिधी)मला पोरकटपणाची उपमा देणाऱ्या अजित पवारांनी तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नये. मीही उत्तर देऊ शकतो. मात्र, आधीच ते जास्त दु:खात आहेत. मी कुठल्या आमदाराला मुस्काटात दिली नाही. शिव्या दिल्या नाहीत. याआधी मी खूप सहन केलंय. जशास-तसं उत्तर दिलं असतं, तर माझ्या विरोधात बोलणारे फोफावले नसते. - खासदार उदयनराजे भोसलेप्रश्न तडीस नेणार...‘ते’ अडचणीत येणार!सातारा : ‘जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला तर मी काय चूक केली सांगा? अनेक वर्षे काही भ्रष्ट लोकांमुळे इरिगेशनची कामे रखडली. माधव चितळे समितीच्या अहवालामध्ये भ्रष्टाचारामुळे जलसंपदा खातंच बंद करावं लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी मी कुठलीही तडजोड करणार नाही, माझ्या मुद्द्यापासून मी बाजूला झालेलो नाही. त्यामुळे हे मुद्दे मी तडीस नेणार...भ्रष्टाचारी मंडळी अडचणीत येणार,’ असा सज्जड इशारा पुन्हा एकदा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी पत्रकार परिषदेत आपली मते व्यक्त केली. उदयनराजे म्हणाले, ‘जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या बैठकीला प्रोटोकॉलनुसार खासदार या नात्याने मला बोलावणे आवश्यक होते. मात्र रामराजेंच्या काळात एकदाही हा प्रोटोकॉल पाळण्यात आलेला नाही. आम्हाला काहीच पत्ता लागत नसेल तर १८ लाख मतदारांच्या प्रश्नांना मी कसा सामोरा जाणार. आज सर्वकाही शेतीवर अवलंबून आहे. मात्र, शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेती पिकाला कोणतेही संरक्षण नाही. या दृष्टिने कोणीही विचार करायला तयार नाही. कुठल्याही कारखान्याच्या भानगडीत मी नसतो. फलटणच्या पाणीप्रश्नाबाबत जाब विचारायला गेलो तर त्यांनी मलाच श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीत ओढून घेतले. कृष्णा खोऱ्यातच सोडून रामराजेंनी कारखान्यातही मोठा भ्रष्टाचार केला आहे, हे लक्षात आले.’जिल्हा बँकेतील राजकारणाबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘काही मूठभर प्रवृत्ती बँकेत आहेत त्यामुळे बँकेत राजकारण आणलं जातंय. गैरव्यवहारांमुळे इतर जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकांची जशी अवस्था झाली, तशी अवस्था सातारा जिल्हा बँकेची होऊ देणार नाही. ही बँक राजकारणविरहित लोकहिताकरिता चालवली पाहिजे.’‘ब्राझील, जपान मध्ये गेल्या ५0 वर्षांपासून इर्मा योजना राबविली जाते. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाला विमा संरक्षण दिले जात असल्याने या देशांत शेतकऱ्यांना सन्मान राखला जात आहे. तोच सन्मान भारतातील शेतकऱ्यांनाही मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीची २२ एप्रिलला मुंबईत बैठकसाातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पॅनेल निश्चितीसाठी मुंबईत २२ एप्रिल रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले मुंबईला जाणार का?, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.उदयनराजे बुधवारी दोन अर्ज दाखल करणार असून यापैकी एका अर्जावर बााळासाहेब पाटलांचे बंधू सूचक म्हणून सही करणार आहेत. अशी माहिती उदयनराजेंनी दिली