शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

फलटण राजघराण्यातील राम, लक्ष्मण अन् भरत-जागतिक बंधूदिन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:57 IST

फलटण : आज सर्वच क्षेत्रांत तीव्र स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत कोण आपला, कोण परका, याचे भान ठेवता जो तो स्वत:पुरतं जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आज सख्खा भाऊ दुसऱ्या भावाला पाण्यात बघतो किंवा सख्खे भाऊ घरवाटणी, राजकरण, पैसा यावरून पक्के वैरी

ठळक मुद्देबंधुप्रेमाचा आदर्श; राजकारणासह समाजकारणातही एकोप्याचे दर्शन

नसीर शिकलगार।फलटण : आज सर्वच क्षेत्रांत तीव्र स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत कोण आपला, कोण परका, याचे भान ठेवता जो तो स्वत:पुरतं जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आज सख्खा भाऊ दुसऱ्या भावाला पाण्यात बघतो किंवा सख्खे भाऊ घरवाटणी, राजकरण, पैसा यावरून पक्के वैरी झाल्याचे दिसतात. भावाभावात भांडणे वाढत असताना फलटणमधील रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर या चुलत भावंडांनी सख्ख्या भावाप्रमाणे नाते टिकवून एक बंधुभावाचा आदर्श निर्माण केला आहे.

आज राजकरण, पैसा, जमीन, नोकरी, उद्योग या क्षेत्रात तीव्र गळेकापू स्पर्धा वाढली आहे. ज्याला त्याला सर्वच पाहिजे, या भावनेने नातीगोती विसरून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्वीच्या काळी रामायण, महाभारतात देखील अनेक भावंडांची भांडणे झालेली आपण ऐकत आहोत. राजसत्तेसाठी भावाने भावाला मारल्याची उदाहरणे आहेत.

भावाभावातील नाते एखाद्या गोष्टीवरून विकोपाला गेल्याचे आपण पाहत आहोत. आज राजकारणातही सख्खे भाऊ एकमेकांविरोधात निवडणूक लढविताना दिसतात, एकमेकाविरोधात कोर्ट, कचेरीत जाताना दिसतात. मात्र, महाराष्ट्रात किंबहुना भारतात म्हणा फलटणच्या राजघराण्यातील नाईक-निंबाळकर भावंडे याचा अपवाद राहिली आहेत.

फलटणला राजघराण्याचे वलय असून, या राजघराण्यातील सध्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, फलटण कृती उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर या तिघा बंधुंनी राजकारणात १९९१ मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून सर्व सत्तास्थाने आजअखेर त्यांच्याच ताब्यात राहिलेली आहेत. सत्तास्थाने ताब्यात असली तरी या तिघा भावांनी नात्यात सत्तेसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कटूपणा आणलेला नाही.संस्कार, अन् आदर्शावर वाटचालयाबाबत अधिक माहिती देताना रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले की, आमचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर व चुलते दिवंगत शिवाजीराजे नाईक-निंबाळकर यांनी घालून दिलेले संस्कार, आदर्श यावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांनी आम्हाला एकत्रित बंधूभावाने राहण्याचा दिलेला सल्ला आम्ही आजही मानत आहोत. त्यामुळे आमच्यात एकोपा आहे. या एकोप्यामुळेच तालुक्यात कोणताही भांडणतंटा नाही. त्यामुळे तालुका विकासाबाबत अग्रेसर राहिला आहे.

आज भावाभावात वादविवाद सुरू असत्याचे उदाहरणे असताना हे तिघे बंधू बंधुभाव जपत राहत आहेत. आज रामराजे, रघुनाथराजे, संजीवराजे यांच्यासारखा एकोपा सातारा जिल्ह्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात कोठेही दिसून येत नाही. वेळप्रसंगी एकमेकासाठी कमीपणा घेणारे हे बंधू आधुनिक काळातील राम, लक्ष्मण, भरत म्हणूनच ओळखले जातात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण