शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

फलटण राजघराण्यातील राम, लक्ष्मण अन् भरत-जागतिक बंधूदिन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:57 IST

फलटण : आज सर्वच क्षेत्रांत तीव्र स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत कोण आपला, कोण परका, याचे भान ठेवता जो तो स्वत:पुरतं जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आज सख्खा भाऊ दुसऱ्या भावाला पाण्यात बघतो किंवा सख्खे भाऊ घरवाटणी, राजकरण, पैसा यावरून पक्के वैरी

ठळक मुद्देबंधुप्रेमाचा आदर्श; राजकारणासह समाजकारणातही एकोप्याचे दर्शन

नसीर शिकलगार।फलटण : आज सर्वच क्षेत्रांत तीव्र स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत कोण आपला, कोण परका, याचे भान ठेवता जो तो स्वत:पुरतं जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आज सख्खा भाऊ दुसऱ्या भावाला पाण्यात बघतो किंवा सख्खे भाऊ घरवाटणी, राजकरण, पैसा यावरून पक्के वैरी झाल्याचे दिसतात. भावाभावात भांडणे वाढत असताना फलटणमधील रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर या चुलत भावंडांनी सख्ख्या भावाप्रमाणे नाते टिकवून एक बंधुभावाचा आदर्श निर्माण केला आहे.

आज राजकरण, पैसा, जमीन, नोकरी, उद्योग या क्षेत्रात तीव्र गळेकापू स्पर्धा वाढली आहे. ज्याला त्याला सर्वच पाहिजे, या भावनेने नातीगोती विसरून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्वीच्या काळी रामायण, महाभारतात देखील अनेक भावंडांची भांडणे झालेली आपण ऐकत आहोत. राजसत्तेसाठी भावाने भावाला मारल्याची उदाहरणे आहेत.

भावाभावातील नाते एखाद्या गोष्टीवरून विकोपाला गेल्याचे आपण पाहत आहोत. आज राजकारणातही सख्खे भाऊ एकमेकांविरोधात निवडणूक लढविताना दिसतात, एकमेकाविरोधात कोर्ट, कचेरीत जाताना दिसतात. मात्र, महाराष्ट्रात किंबहुना भारतात म्हणा फलटणच्या राजघराण्यातील नाईक-निंबाळकर भावंडे याचा अपवाद राहिली आहेत.

फलटणला राजघराण्याचे वलय असून, या राजघराण्यातील सध्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, फलटण कृती उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर या तिघा बंधुंनी राजकारणात १९९१ मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून सर्व सत्तास्थाने आजअखेर त्यांच्याच ताब्यात राहिलेली आहेत. सत्तास्थाने ताब्यात असली तरी या तिघा भावांनी नात्यात सत्तेसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कटूपणा आणलेला नाही.संस्कार, अन् आदर्शावर वाटचालयाबाबत अधिक माहिती देताना रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले की, आमचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर व चुलते दिवंगत शिवाजीराजे नाईक-निंबाळकर यांनी घालून दिलेले संस्कार, आदर्श यावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांनी आम्हाला एकत्रित बंधूभावाने राहण्याचा दिलेला सल्ला आम्ही आजही मानत आहोत. त्यामुळे आमच्यात एकोपा आहे. या एकोप्यामुळेच तालुक्यात कोणताही भांडणतंटा नाही. त्यामुळे तालुका विकासाबाबत अग्रेसर राहिला आहे.

आज भावाभावात वादविवाद सुरू असत्याचे उदाहरणे असताना हे तिघे बंधू बंधुभाव जपत राहत आहेत. आज रामराजे, रघुनाथराजे, संजीवराजे यांच्यासारखा एकोपा सातारा जिल्ह्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात कोठेही दिसून येत नाही. वेळप्रसंगी एकमेकासाठी कमीपणा घेणारे हे बंधू आधुनिक काळातील राम, लक्ष्मण, भरत म्हणूनच ओळखले जातात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण