शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पावसानं मारलं; धोम-बलकवडीनं तारल

By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST

खंडाळा तालुका : यावर्षी सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी तरीही अनेक गावांना वरदान, तलावांबरोबर विहिरीही भरल्यां

दशरथ ननावरे-- खंडाळा तालुक्यात दरवर्षीपेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त इतर तालुक्यातून पाण्याची टंचाई भासत आहे. मात्र, खंडाळा तालुक्यात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे अद्याप तरी टंचाई जाणवत नाही. त्यामुळे पावसाने जरी मारलं असलं तरी धोम-बलकवडीने तारलं आहे. खंडाळा तालुक्यासाठी धोम-बलकवडी वरदायिनी ठरत आहे. तालुक्यातील तलाव, विहिरी भरल्या आहेत.खंडाळा हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून गणला जात होता. डिसेंबर उजाडला की गावोगावी विशेषत: पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत जात होता. मात्र, वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरणाचे पाणी कालव्याने खंडाळा तालुक्याच्या माळरानावरून वाहू लागले आणि तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाचे चित्र पालटले. धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे असवली, अजनुज, म्हावशी, वाण्याचीवाडी, खंडाळा, हरळी, धावडवाडी, अहिरे, घाटदरे, बोरी, पाडळी, सुखेड, खेड बु।।, कोपर्डे, निंबोडी या पूर्व भागातील गावांना वरदान ठरले आहे. गावोगावी असणारे तलाव, विहिरी या पाण्यामुळे भरल्या गेल्याने केवळ पिण्याच्याच पाण्याचा नाही तर शेती पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला आहे. कधी काळी या भागात मूग, मटकी खेरीज काहीच पिकले जात नव्हते. तिथे उसासारखी पिकांचे उत्पादन वाढले आहे. तालुक्यातील बहुतांशी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता; मात्र आता कुठेही टँकर द्यावा लागत नाही. धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याचे रोटेशन २१ दिवसांचे असते. त्यामुळे गरजेनुसार पाणी उपलब्ध होते. ठिकठिकाणी तलाव भरल्याने शेती पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. तालुक्याचा दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्यात धोम-बलकवडी प्रकल्पाचे उद्गाते राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार मकरंद पाटील यांचे योगदान आहे. या पाण्यामुळे शेती समृद्ध तर बनलीच आहे. पण, त्याचबरोबर उद्योगधंद्यांनाही याचा उपयोग होत आहे.खंडाळा तालुक्यातील गावोगावचा पाण्याच्या टंचाईचा प्रश्न धोम-बलकवडीमुळे मिटला आहे. योग्य वेळेत धरणाचे पाणी मिळाल्याने शेतीला फायदा झाला आहे. लोकांनी मिळालेल्या पाण्याचा वापर योग्यरीतीने आणि काटकसरीने करायला हवा.- आमदार मकरंद पाटीलधोम-बलकवडीमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली तसेच शेतीला पाणी मिळाले. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पोटपाटाने शिवारात पाणी खेळल्याने शेती पिके जोरात आहेत.-शांतीलाल दशरथे, घाटदरेसाखर कारखान्याला धोमचे वरदान...खंडाळा तालुक्यात सहकारी साखर कारखाना उभा राहत आहे. या कारखान्यासाठी लागणारा ऊस तालुक्यातच उत्पादित होत आहे. ५० ते ७० हजार टनांवरून तालुक्यात उसाचे उत्पादन पाच लाख टनांपर्यंत वाढले आहे. याचा फायदा कारखान्याला होणार आहे. कारखान्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्प वरदान ठरणार आहे.