शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

फिरणाऱ्यांना प्रश्न विचारून पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

सातारा : जिल्ह्यात गुरुवारपासून संचारबंदी सुरू झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या समस्या आणि किस्से पाहायला मिळाले. अनेकजण काहीही कारण सांगून घराबाहेर ...

सातारा : जिल्ह्यात गुरुवारपासून संचारबंदी सुरू झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या समस्या आणि किस्से पाहायला मिळाले. अनेकजण काहीही कारण सांगून घराबाहेर पडत होते. अशा प्रत्येकाला अडवून पोलिसांना विचारावे लागत होते. कुठे चाललाय, काय काम आहे, असे सतत प्रश्न विचारून पोलिसांची अक्षरश: दमछाक झाली. सरतेशेवटी पोलिसांनी विचारणे बंद केले.

जिल्ह्यात जमावबंदी आणि संचारबंदी सुरू आहे. याचे पालक होण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. जिल्ह्यात १९०० पोलिसांचा बंदोबस्त असून, सर्व अधिकारीही फील्डवर उतरले आहेत. चाैकाचाैकात तपासणी केंद्रे उभारली आहेत. सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत पोलिसांनी प्रत्येकाकडे कसून चाैकशी केली. काही जणांना ठोस कारण सांगता आले नाही, अशा लोकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. अनेकजण किराणा माल, लसीकरण, कोरोना टेस्टसाठी घराबाहेर पडले होते. ज्यांची कारणे खरी होती. त्यांना पोलिसांनी सोडून दिले. मात्र, थातूरमातून कारणे सांगण्याऱ्यांना पोलीस घरी पिटाळून लावत होते.

सातारा शहरात विशेषत: पोवई नाका, विसावा नाका आणि राजवाडा परिसरात नेहमीसारखीच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. संचारबंदी काय असते, हेही अनेकांना माहिती नव्हते. दुकाने बंद नाहीत, म्हणजे आपण बाहेर जाऊ शकतो, अशी धारणा लोकांची झाल्याचे दिसून आले. साताऱ्यात दुपारी मात्र रस्त्यावर शुकशुकाट होता. शहरातील मुख्य चाैकांमध्ये पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. त्यामुळे फारसी वर्दळ नव्हती. संध्याकाळी सहानंतर मात्र, नेहमीप्रमाणे नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले. अशा लोकांना मात्र पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. ठोस कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने सांगितले असले तरी अनेकजण कोणतेही निमित्त करून घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. गुरुवारी संचारबंदीचा पहिला दिवस होता. त्यामुळे पोलिसांनी फारसे कडक धोरण अवलंबले नाही. पोलिसांकडून शुक्रवारपासून अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

चाैकट : जसा आदेश तशी अंमलबजावणी...

गतवर्षी लाॅकडाऊनमध्ये पोलिसांनी प्रचंड कडक अंमलबजावणी केली. मात्र, यंदा याउलट स्थिती आहे. पोलिसांना केवळ साैम्य आदेश देण्यात आले आहेत. लाठीहल्ला, मारझोड करून नये, अशा सूचनाही देण्यात आल्या असल्याचे समजते. जो कोणी ऐकत नाही, अशांवर दंडात्मक कारवाई अगदीच वेळ पडल्यास संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जाणार आहेत.