शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

फिरणाऱ्यांना प्रश्न विचारून पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

सातारा : जिल्ह्यात गुरुवारपासून संचारबंदी सुरू झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या समस्या आणि किस्से पाहायला मिळाले. अनेकजण काहीही कारण सांगून घराबाहेर ...

सातारा : जिल्ह्यात गुरुवारपासून संचारबंदी सुरू झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या समस्या आणि किस्से पाहायला मिळाले. अनेकजण काहीही कारण सांगून घराबाहेर पडत होते. अशा प्रत्येकाला अडवून पोलिसांना विचारावे लागत होते. कुठे चाललाय, काय काम आहे, असे सतत प्रश्न विचारून पोलिसांची अक्षरश: दमछाक झाली. सरतेशेवटी पोलिसांनी विचारणे बंद केले.

जिल्ह्यात जमावबंदी आणि संचारबंदी सुरू आहे. याचे पालक होण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. जिल्ह्यात १९०० पोलिसांचा बंदोबस्त असून, सर्व अधिकारीही फील्डवर उतरले आहेत. चाैकाचाैकात तपासणी केंद्रे उभारली आहेत. सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत पोलिसांनी प्रत्येकाकडे कसून चाैकशी केली. काही जणांना ठोस कारण सांगता आले नाही, अशा लोकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. अनेकजण किराणा माल, लसीकरण, कोरोना टेस्टसाठी घराबाहेर पडले होते. ज्यांची कारणे खरी होती. त्यांना पोलिसांनी सोडून दिले. मात्र, थातूरमातून कारणे सांगण्याऱ्यांना पोलीस घरी पिटाळून लावत होते.

सातारा शहरात विशेषत: पोवई नाका, विसावा नाका आणि राजवाडा परिसरात नेहमीसारखीच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. संचारबंदी काय असते, हेही अनेकांना माहिती नव्हते. दुकाने बंद नाहीत, म्हणजे आपण बाहेर जाऊ शकतो, अशी धारणा लोकांची झाल्याचे दिसून आले. साताऱ्यात दुपारी मात्र रस्त्यावर शुकशुकाट होता. शहरातील मुख्य चाैकांमध्ये पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. त्यामुळे फारसी वर्दळ नव्हती. संध्याकाळी सहानंतर मात्र, नेहमीप्रमाणे नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले. अशा लोकांना मात्र पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. ठोस कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने सांगितले असले तरी अनेकजण कोणतेही निमित्त करून घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. गुरुवारी संचारबंदीचा पहिला दिवस होता. त्यामुळे पोलिसांनी फारसे कडक धोरण अवलंबले नाही. पोलिसांकडून शुक्रवारपासून अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

चाैकट : जसा आदेश तशी अंमलबजावणी...

गतवर्षी लाॅकडाऊनमध्ये पोलिसांनी प्रचंड कडक अंमलबजावणी केली. मात्र, यंदा याउलट स्थिती आहे. पोलिसांना केवळ साैम्य आदेश देण्यात आले आहेत. लाठीहल्ला, मारझोड करून नये, अशा सूचनाही देण्यात आल्या असल्याचे समजते. जो कोणी ऐकत नाही, अशांवर दंडात्मक कारवाई अगदीच वेळ पडल्यास संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जाणार आहेत.