शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा दर पुन्हा गडगडला; क्विंटलला २५०० पर्यंत भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली, तरी दर मात्र गडगडला आहे. क्विंटलला २५०० रुपयांपर्यंत भाव ...

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असली, तरी दर मात्र गडगडला आहे. क्विंटलला २५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर कोबी अन् वांगीही स्वस्तच आहेत. त्याचबरोबर डाळींचे भाव कडाडले असून, खाद्यतेलाच्या दरातही तेजी पाहायला मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते.

सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ४८१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याची ३०५ क्विंटलची आवक झाली. कांद्याला १ हजारापासून २५०० रुपयांपर्यंत भाव आला. वांग्याला १० किलोला अवघा ५० ते १०० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ६० ते १००, कोबी ३० ते ४० रुपये, फ्लाॅवरला १०० ते १५०, दोडका ३०० ते ३५० आणि कारल्याला २५० ते ३०० रुपये दर आला.

तेलाच्या पाऊचमागे वाढ

मागील दोन महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत आहेत. या आठवड्यातही तेलाच्या एक लिटरच्या पाऊचमागे सरासरी १० रुपयांची वाढ आहे. सूर्यफूल तेलाच्या पाऊचची किंमत १५० ते १६० रुपये झाली; तर सोयाबीन १२५ ते १३० आणि शेंगदाणा तेल पाऊचची किंमत १७० ते १८० आहे. तेल डब्यामागेही किरकोळ वाढ झालेली आहे.

कलिंगडे अनेक ठिकाणी

साताऱ्यात फळांची आवक चांगली आहे. अधिक करून कलिंगडाची आवक आणि विक्री जोरात आहे. शहरात अनेक ठिकाणी विक्री सुरू आहे.

गवार महाग...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर कमी झाले असले, तरी काहींचे टिकून आहेत. गवारला तर १० किलोला ४०० ते ६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे गवारची किरकोळ विक्री ८० रुपयांपर्यंत पोहोचली, तर ढबू, वाटाणा, भेंडी, पावटा, वालघेवडा यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.

साताऱ्यात अनेक भाज्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र, गवार, शेवगा यांचे दर अजूनही महागच वाटतात; तर गेल्या आठवड्यात ५० रुपयांवर गेलेला कांदा आता ३० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

- सीताराम पवार, ग्राहक

खाद्यतेलाच्या दरात सतत वाढ होत चालली आहे. याला कारण, पाश्चात मार्केट. या आठवड्यात तेलाच्या एक लिटरच्या पाऊचमागे १० रुपयांपर्यंत वाढ आहे. तसेच तेलडब्यामागेही वाढ आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात पुन्हा उतार आला आहे. त्यामुळे केलेला खर्च कसाबसा मिळेल. पण, इतर पालेभाज्यांचे दरही कमी आहेत. यामुळे नुकसानच होत आहे.

- दिनकर पाटील, शेतकरी