शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

तौक्ते वादळामुळे जिल्ह्यात एक कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तौक्ते वादळामुळे जिल्ह्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने काढलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : तौक्ते वादळामुळे जिल्ह्यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने काढलेला आहे. या नुकसानीत लोकांच्या वैयक्तिक मालमत्तेसह सार्वजनिक मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामध्ये वीज वितरणला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

जिल्ह्यात १७ मे रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यात ठिकाणी दरडी कोसळल्या विजेचे खांब उन्मळून पडले, झाडे कोसळली. अनेक घरांचे पत्रे उडाले व भिंती कोसळल्या. जिल्ह्यातील काही शाळांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार या वादळात एक कोटीचे नुकसान झाले आहे; मात्र पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नेमके किती नुकसान झाले, हे समोर येईल कदाचित यापेक्षाही जास्त नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानंतर महसूल प्रशासनाने स्थानिक कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे सांगितले होते त्यानुसार ढोबळे अंदाजानुसार तलाठी, कृषी कर्मचारी, तसेच ग्रामसेवक यांनी केलेल्या नुकसानीच्या पाहणीनंतर जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जावळी तालुक्यामध्ये नऊ घरांची पडझड झाली. कोरेगाव तालुक्यात एका घराचे नुकसान झाले. कऱ्हाड तालुक्‍यात सात घरांची पडझड झाली, तर दोन जनावरांचे गोठे, एक पोल्ट्री शेड व एका शाळेचे मोठे नुकसान झाले. पाटण तालुक्यातील दहा घरांचे नुकसान झाले. महाबळेश्वर तालुक्यात २२ घरांचे, तीन शासकीय इमारतींचे नुकसान झाले. अठरा विद्युत पोल वाहनांचे नुकसान झाले. सात घरांचे, एका शाळेचे नुकसान झाले. १० विद्युत खांबांची नुकसान झाले. आंबा, नारळ, फळबागांचे नुकसान झाले. खंडाळा तालुक्यात विद्युत खांब कोसळले.

जिल्ह्यात विजांच्या तारा, तसेच खांब जमिनीवर पडले. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वीज कंपनीने हे काम उभे करण्याची, तसेच तारा दुरुस्त करण्याचे काम हाती घेतलेले आहे.

पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाला अहवाल जाणार

जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम नुकसान किती झाले याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.

१७ मे रोजी जिल्ह्यात झालेला पाऊस

सातारा : १९.१०, जावळी : ३२.४०, कोरेगाव : ६.११, कराड : ३२.९२, पाटण : ३५.०८, माण : ०.४२, खटाव : ५.८१, महाबळेश्वर : ९४.७, वाई : १८.१४, खंडाळा : २.४५

जिल्ह्याची सरासरी : २२.५३