शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्की फसवणुकीचा आता हिशेब!

By admin | Updated: July 19, 2015 23:37 IST

पाटण तालुका : ग्रामपंचायत निवडणूक; मोरणा परिसरात राजकीय वातावरण तापले

अरूण पवार-पाटण -तालुक्यातील मोरणा पठारावर गेल्या पाच वर्षांत पवनचक्की प्रकल्पांमुळे झालेली प्रचंड उलाढाल आणि ग्रामस्थांवर आलेले कठीण प्रसंग, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार, यामुळे मेटाकुटीस आलेल्या स्थानिकांना आता ग्रामपंचायत निवडणुकांद्धारे पुढाऱ्यांना योग्य वळणावर आणण्याची संधी साधून आली आहे. पवनचक्की प्रकल्पाच्या पट्ट्यातील तब्बल १५ ग्रामपंचायत निवडणुकांतून असे चित्र निर्माण होणार आहे. दरम्यान, येथील राजकीय वातावरण तापले आहे.पाटण पाटण तालुक्याचा मोरणा परिसर हा आमदार शंभूराज देसाई यांचा बालेकिल्ला आहे. कारण या विभागातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि १५ ग्रामपंचायतींवर देसाई गटाचे वर्चस्व आहे. तरीही माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या ताब्यात या विभागातील आंब्रग, नाटोशी, माणगाव, मोरगिरी, गुंजाळी अशा ग्रामपंचायती आहेत. येत्या ४ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मतदानासाठी मोरणा पठारावरील कोकिसरे, धावडे, पाचगणी, आटोली, गोकुळ तर्फ पाटण, पेठशिवापूर, आंबेघर तर्फ मरळी, माणगाव, आडदेव, वाडी कोतावडे, नेरळे, किल्ले मोरगिरी, पाळशी, झाकडे या ग्रामपंचायती सज्ज झाल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांत पवनचक्की प्रकल्पाने बस्तान बसवले असून, येथील शेतकऱ्यांना या प्रकल्पापायी तुरुंगाची हवादेखील खावी लागली आहे.अनेकांच्या शेतजमिनीमध्ये अतिक्रमण करण्यात आले. लाखोंचे बोगस चेक देऊन शेतकऱ्यांना फसविले. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी विश्वासात न घेता पवनचक्की कंपन्यांना ना हरकत प्रमाणपत्र देऊन टाकले. पुढाऱ्यांनी पवनचक्की व्यवस्थापनाच्या आमिषाला बळी पडून लाखोंची माया गोळा केली. त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये असंतोष आहे. याचा हिशोब चुकता करण्यासाठी राजकीय गट-तट न विचारात घेता ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गावातील तरुणांनी वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. सत्ताधारी म्हणून आमदार शंभूराज देसाई हे अजूनही मोरणा विभागातील पवनचक्की प्रकल्प अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी झालेले नाहीत, तर विरोधक या नात्याने माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर सक्षम विरोधकांची भूमिका निभावताना दिसत नाहीत. नेत्यांचे मोरणा परिसरावर लक्ष सध्या आमदार शंभूराज देसाई व त्यांचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांची पकड मोरणा विभागावर आहे. त्या तुलनेत माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडे सत्तास्थाने नाहीत. अनेक वर्षे मोरणा विभागात असलेले खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपददेखील या वेळेस काढून घेण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी स्वत: नेत्यांनाच मोरणा विभागात लक्ष घालावे लागले आहे. ये रे माझ्या मागल्या...मोरणा विभागात जवळपास अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्यामुळे परिवर्तन करण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र, प्रत्येक गावात राजकीय गटांचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्या दबावाखाली पॅनेलची निवड होते. त्यातून निवडून आलेल्यांना त्यांच्या विचारानुसारच कारभार करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे चालत राहतो.