शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

तीन वर्षांच्या कामासाठी तब्बल नऊ वर्षे -: सातारा-पुणे महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:50 AM

दुरुस्तीच्या नावाखाली महामार्गावरील खड्ड्यांची आजपर्यंत अनेकदा डागडुजी करण्यात आली. मात्र, ही कामे दीर्घकाळ टिकू शकली नाहीत. पावसाळ्यात खड्ड्यांची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाकडून दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

ठळक मुद्दे३४ खड्डे ठरताहेत जीवघेणे; दोन वर्षांत या मार्गावरील अपघातांमध्ये ७४७ जणांचे बळी

प्रगती जाधव-पाटील।सातारा/कोल्हापूर : दळणवळण हे कोणत्याही शहराच्या विकासाचा कणा मानला जातो. पुणे-सातारा मार्गाचे सहापदरीकरण करण्यासाठी १ आॅक्टोबर २०१० ला सुरुवात झाली. हे काम ३१ मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र १४० किलोमीटरचा हा रस्ता गेल्या सव्वा नऊ वर्षांत अद्यापही

‘जैसे थे’ अवस्थेतच आहे.कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांतून पुणे-मुंंबईकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर पहिले काही वर्षे हा रस्ता सर्वांसाठी वरदायी ठरला होता. अवघ्या दोन तासात सातारा-पुणे आणि चार तासांत पुणे-कोल्हापूर असा प्रवास अनेकांसाठी सुखदायी ठरत होता; पण पुढे देखभालीअभावी या रस्त्याची वाताहत होत गेली.

यंदा झालेल्या उच्चांकी पावसामुळे सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे; पण राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ७४७ जणांचे बळी गेले आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग दिवस-रात्र वाहनांनी ओसंडून वाहत असतो.

विक एंडला तर वाहनांच्या रांगाच रांगा, हे चित्र अगदी ठरलेलेच असते. अशा स्थितीत या रस्त्यावरून जाणाऱ्यांचे जेवणापासून शौचालयापर्यंत हाल होतात. राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची अवस्था लक्षात घेता येथून प्रवास करणे जीवघेणे झाले आहे. दिवसा उजेडात किमान रस्ता तरी स्पष्ट दिसतो. रात्री तर खड्ड्यांची खोली आणि लांबीचाही अंदाज न आल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. कुठला खड्डा चुकवावा आणि कोणत्या खड्ड्यातून गाडी न्यावी, याचा विचार करेपर्यंत अपघात होत असल्याने हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना महामार्गावरून प्रवास करताना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली महामार्गावरील खड्ड्यांची आजपर्यंत अनेकदा डागडुजी करण्यात आली. मात्र, ही कामे दीर्घकाळ टिकू शकली नाहीत. पावसाळ्यात खड्ड्यांची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाकडून दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

महामार्गावर बहुतांशी ठिकाणी दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. रिफ्लेक्टर, दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नाही. महामार्गावरून प्रवास करणाºया पर्यटकांचीही बºयाचदा फसगत होताना दिसते. हा महामार्ग आहे की खड्ड्यांची शर्यत? असा प्रश्न प्रत्येकजण उपस्थित करीत आहे.

सेवा रस्ते उरले फक्त नावालानियमानुसार महामार्गावर साडेसात मीटर रुंदीचे सेवा रस्ते असणे अत्यावश्यक आहे. असे असताना सातारा ते शिरवळपर्यंत कोठेही सेवा रस्ते नाहीत. ज्या ठिकाणी आहेत त्यांची रुंदी कमी असल्याने एकावेळी दोन वाहने ये-जा करू शकत नाहीत.अनेक सेवा रस्त्यांवरून थेट महामार्गावर येण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली आहे. त्यामुळे सेवा रस्त्यांवरून महामार्गावर येण्याच्या प्रयत्नात असणारे अनेकजण वेगाने येणाऱ्या गाड्यांचे बळी पडत आहेत.

तब्बल पाचवेळा प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ

  • १ आॅक्टोबर २०१० रोजी सातारा-पुणे या सुमारे १४० किलोमीटर रस्त्याच्या सहापदरीकरणाची सुरुवात. ३१ मार्च २०१३ ला हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.
  • प्रत्यक्षात मात्र या कामाला गेल्या सव्वानऊ वर्षांत तब्बल पाचवेळा मुदतवाढ मिळाली. इतक्यांदा मुदतवाढ मिळाल्यानंतरही या कामाची गती कुठेच वाढलेली दिसली नाही.

 

काही वर्षांपूर्वी स्वारगेट-कोल्हापूर हे अंतर अवघ्या चार तासांत पार केलं जायचं. सध्या रस्त्यातील खड्ड्यांमुळे हे अंतर किमान सात तासांचे झाले आहे. पूर्वी कुटुंबीय गावी येण्याचा आग्रह करायचे. आता चित्र बदलले आहे. जीव धोक्यात घालून येण्यापेक्षा फोनवरच खुशाली कळवत राहा, असं सांगतात.सौरभ देसाई, कोल्हापूर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPuneपुणेkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग