Satara: घटस्फोटीत शिक्षकांची नोंद सेवा पुस्तकात होणार?, अनेकांचे धाबे दणाणले
By नितीन काळेल | Updated: May 29, 2025 18:36 IST2025-05-29T18:35:01+5:302025-05-29T18:36:38+5:30
कर्मचारी बदली प्रक्रिया पारदर्शकपणाची प्रशासनाकडून माहिती

Satara: घटस्फोटीत शिक्षकांची नोंद सेवा पुस्तकात होणार?, अनेकांचे धाबे दणाणले
नितीन काळेल
सातारा : जिल्हा परिषदे अंतर्गत क आणि ड संवर्गात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसारच झालेली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली. दरम्यान,, जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्याबदली प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घटस्फोटीतांची नोंद सेवा पुस्तकात करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा परिषदे अंतर्गत दरवर्षी मे महिन्यात संवर्ग क आणि डमधील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया पार पाडली जाते. यावर्षीही मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद यांच्या मार्गदर्शनाखाली ही बदली झाली. प्रशासकीय, आपसी आणि विनंती अशा या बदल्या झालेल्या आहेत. तरीही या बदल्यावरुन आरोप सुरू झालेले आहेत. समााजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तर २ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी पत्रकार परिषदेत बदलीविषयी माहिती दिली.
अर्चना वाघमळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेतील आताची कर्मचारी बदली प्रक्रिया ही सामान्यीकरण तत्वानुसार आणि पारदर्शकपणे झाली आहे. या बदली प्रक्रियेचे रेकाॅर्डिंग आहे. बदलीत अन्याय झाल्याबाबत एकही निवेदन तसेच तक्रार आलेली नाही. एखाद्याची बदली मनाप्रमाणे झाली नसेल तर चुकीचे प्रकार चर्चेस आणले जातात. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनाही या बदलीबाबत माहिती देणार आहोत. त्यांना बदलचीची सर्व प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे. कोणाची बदलीबाबत तक्रार असेल त्यांनी समितीकडे अर्ज किंवा तक्रार द्यावी. त्याचे निराकारण करण्यात येईल.
दरम्यान, प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रियाही लवकरच होणार आहे. या बदलीबाबत चुकीचे प्रमाणपत्र घेणाऱ्यांची तपासणी होणार आहे. त्याचबरोबर घटस्फोटीत शिक्षकांची नोंद सेवा पुस्तकावर करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. यामुळे अनेकांना पुढील अडचणींना सामोरे जावू लागू शकते.