शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याचा उत्तरार्ध परमार्थाने उजळतोय!

By admin | Updated: August 19, 2015 21:21 IST

कऱ्हाडचे महिला मंडळ : भजन सेवेची रौप्यमहोत्सवी वाटचाल

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  महाराष्ट्रातील सुमारे ८५० वर्षांपूर्वीपासून संत विचारांची परंपरा आजच्या जमान्यातही टिकून आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदींनी घालून दिलेल्या परमार्थाच्या वाटेवरूनच अनेकांचे मार्गक्रमण चालू असल्याचे आजही दिसते. कऱ्हाडच्या वीरशैव महिला भजनी मंडळाने तर गेल्या २५ वर्षांपासून अभंग, ओव्या, गवळणी म्हणत रौप्यमहोत्सवी वाटचाल केली आहे. या मंडळातील बहुतांशी सदस्यांनी साठी तर गाठली आहेच; पण काहीनी वयाची पंचाहत्तरीही पूर्ण केली आहे.भजन सेवेतून आपले जगणे सुसह्य करणाऱ्या, भजन सेवेत दंग राहणाऱ्या या सदस्यांना ‘राम राम म्हणता म्हणता, जावो प्राण’ असेच वाटत असावे. जणू त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध परमार्थानेच उजळतोय, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या धमण्यांतून संतांचे विचार वाहतात, असं म्हंटलं तरी चुकीचे ठरणार नाही. जन्माचे ते मूळ । पाहिले शोधून । दु:खाशी कारण । जन्म घ्यावा ।।म्हणजे, दु:ख भेगण्यासाठीच माणसाने जन्म घ्यावा, असे संत सांगतात तर, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधुनी पाहे ।, असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. त्यामुळे या सर्व दु:खावर ‘विठ्ठलाचे नामस्मरण’ हा एकमेव रामबाण उपाय आहे, हे कळल्यामुळेच कऱ्हाडातील पंधरा-वीस महिला १९९१ मध्ये एकत्र आल्या. भजनी मंडळ स्थापन करायचं ठरवलं. गणेश पारगावकर यांच्याकडून भजनाचे धडे घेतले; अन् आजवर हजारो भजनांचे कार्यक्रम त्यांनी केले. खरंतर प्रत्येकाच्या जीवनात, प्रपंच्यात अनेक व्यथा, अडचणी, अपार कष्ट, हे सारं असतंच; पण त्या साऱ्यावर पुष्पा दळवी, सुनंदा देशमाने, रेखा घाटे, सुरेखा डुबल, कालिंदी डुबल, शालन विभुते, राजश्री चिंगळे, सुमन जंगम, कमल बेडके, लता बेंद्रे, छाया मुंढेकर, लीला फल्ले, उषा उमरदंड, मुक्ता घाटे, कल्पना दळवी, सुनीता गुजर, शालिनी वांगकर, जयश्री तोडकर यांनी महिला भजनी मंडळाची वाटचाल सुरू केली. एखाद्या गोष्टीत स्वत:ला झोकून देणं अन् त्यात सलग २५ वर्षे सातत्य ठेवणं खूप कठीण काम; पण ते काम या महिलांनी केलं आहे.सामाजिक बांधिलकीचीही जाणीव भजन अन् रूद्र पठणात नेहमी मग्न राहणाऱ्या या महिलांच्या मनात सामाजिक बांधिलकीची जाणही तितकीच आहे. म्हणून तर दुष्काळग्रस्त भागातील चारा छावणीसाठी आर्थिक मदत, कारगिल युद्धातील शहीद झालेल्या सैनिकांच्या कल्याणनिधीसही मदतीचा हात त्यांनी त्या-त्यावेळी दिला आहे. खरंतर आज सासूने सुनेचं अन् सुनेनं सासूचं कौतुक केल्याचं दृश्य दुर्मिळ झालंय; पण भजनसेवेची रौप्यमहोत्सवी वाटचाल करणाऱ्या या सर्व सासवांचा त्यांच्या सुनांनी नुकताच एक कार्यक्रम घेऊन सत्कार केला. तेव्हा आता ‘तुम्ही चालवा हा पुढे वारसा’ अशी साद सासूबार्इंनी आपल्या सूनबार्इंना घातली. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, प्रा. शीला कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्या जपताहेत रूद्र पठणाचीही परंपरा... भजनाबरोबर या मंडळाच्या सदस्या रूद्र पठणही करतात. सुमारे तीन तास चालणाऱ्या रूद्र पठणाचे कऱ्हाडसह मुंबई, पुणे, केल्हापूर आदी जिल्ह्यांत केले आहेत. आजवर त्यांनी सुमोर पाचशे कार्यक्रम केले असल्याचे पुष्पा दळवी सांगतात. त्यांच्या या उपक्रमांचेही समाजातून कौतुक होत आहे.