शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

लोकशाहीला घातक ठरणाऱ्या भाजपची हुकूमशाही मोडीत काढूया, रणजितसिंह देशमुख यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:10 PM

शेखर जाधव  वडूज : खटाव तालुका हा क्रांतीकारकांचा तालुका असून चळवळ अथवा लढा उभारणे या तालुक्याला नवीन नाही. लोकशाहीला ...

शेखर जाधव वडूज : खटाव तालुका हा क्रांतीकारकांचा तालुका असून चळवळ अथवा लढा उभारणे या तालुक्याला नवीन नाही. लोकशाहीला घातक ठरणाऱ्या भाजपची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी 'हातसे हात जोडो' अभियानाच्या माध्यमातून  काँग्रेसचे विचार गावा-गावांत पोहचवणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख यांनी केले.येथील फिनीक्स ऑर्गनायझेशन सभागृहात काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते राजूभाई मुलाणी, तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, डॉ.महेश गुरव, सत्यवान कमाने, पांडूरंग खाडे, आनंदा साठे, राहुल सजगणे आदीची उपस्थिती होती.यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या खाईत लोटले आहे. सर्वसामान्य जनतेला आधार देत व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज असून गाव तेथे शाखा उभारून काँग्रस विचारसरणीची पाळेमुळे घट्ट करणार आहे. भारत जोडो यात्रेतील सभेमुळे मोदी सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळे खोटे आरोप करत खासदार राहूल गांधी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे म्हणाले.राष्ट्रीय कॉग्रेस माण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. महेश गुरव म्हणाले की, खटाव - माण तालुक्यात सध्या झळकणारे, विकासकामांचे कोटींची उड्डाने घेणारे,  प्रसिद्धीचे माँडर्न सिटीसारखे फ्लेक्स बोर्ड यापूर्वी देखील पाहिले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी  मंजूर केलेली कामेही या चमकोगिरी भाजपच्या आमदारांनी प्लेक्स बोर्डवर आणून त्यांचे ही श्रेय लाटले. त्यामुळे यापुढील काळात नौटंकी करणाऱ्या आमदाराची डाळ येथील जनता शिजू देणार नाही. तालुकाघ्यक्ष संतोष गोडसे यांनी तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर लवकरच जनआंदालने उभारणार असल्याचे सांगितले.        सत्यवान कमाने यांनी प्रास्तावीक, विजय शिंदे यांनी सुत्रसंचालन तर युवकचे जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी सरपंच सदाशिव खाडे, जोतिराम बागल, आकाराम खाडे, परेश जाधव, राजेंद्र माने, निलेश घार्गे, सयाजी सुर्वे, राम कुलकर्णी आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसBJPभाजपा