शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी बोगस खातेदारांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोयना प्रकल्प पुनर्वसनग्रस्तांना जमिनी वाटपाबाबत घेतलेल्या हरकती जिल्हा पुनर्वसन ऑफिसला जमा केलेल्या आहेत, त्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोयना प्रकल्प पुनर्वसनग्रस्तांना जमिनी वाटपाबाबत घेतलेल्या हरकती जिल्हा पुनर्वसन ऑफिसला जमा केलेल्या आहेत, त्यावर कार्यवाही करून परिपूर्ण काम न केल्याने बोगस खातेदारांना वाटप केलेल्या जमिनीची माहिती समोर येत आहे, त्यात अधिकारी आणि एजंट यांचे साटेलोटे असल्यामुळेच विलंब लागत आहे, असा आरोप श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि जे पात्र खातेदार आहेत, त्यांचे जमीन वाटप तत्काळ सुरू करावे.

श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कोयना धरणग्रस्तांच्या व अभयारण्यग्रस्तांच्या संघर्षातून तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी मंजूर केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत सातारा जिल्हा प्रशासन संथगतीने काम करत आहे. धरणग्रस्तांच्या संकलनाचे काम चावडी वाचनानंतर पूर्ण होऊन त्यावर जिल्हा प्रशासनाने हरकती घेऊन देखील काम अंतिम झालेले नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयातून त्रुटी विरहित संकलन १०० टक्के करण्याकरता प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, पण सोलापूर आणि रायगडमध्ये जे प्रस्ताव पूर्वी गेले आहेत, त्यावर मात्र कारवाई होणार का? सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना सातारा जिल्हा प्रशासनाने कोणत्या धरणाचे संकलन त्रुटी विरहित केले आहे, ते जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावे मग महू, नीरा- देवधर वगैरे धरणांचे संकलन त्रुटी विरहित केले आहे, असे समजून बोगस खातेदारांना जमीन वाटप कसे काय केले आहे? त्यात तुमचा हिस्सा किती आहे, हे पुनर्वसन विभागाने जाहीर करावे.

कोयनेच्या पात्रता लक्षात न घेता बोगस यादी वाटपासाठी वरिष्ठ मंत्र्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे, त्यातील खरे किती आणि बोगस किती याची माहिती धरणग्रस्तांच्यासमोर आली पाहिजे. बोगस वाटप कशा पद्धतीने व कोठे बैठक कोण कोणा कोणाबरोबर होतात, त्याची जनतेला पुरेपूर माहिती आहे, त्यामुळेच कोयनेच्या खऱ्या -खुऱ्या प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यासाठी कोरोनाचे कारण सांगून विलंब लावत आहे. हा विलंब नक्की कशासाठी असे जनता विचारू लागली आहे. त्यामुळे हा विलंब हा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी केला जात आहे, का असा सवाल आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी धरणग्रस्तांनी केला आहे.

कोट

ज्या धरणग्रस्तांनी बोगस पद्धतीने जमिनी घेतल्या आहेत, त्याबाबत तक्रारी सुद्धा केल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता त्या फाईल ऑफिसला बाजूला ठेवून त्यांना पाठीशी घातल्याचे दिसून येत आहे.

- प्रकाश साळुंखे

श्रमिक मुक्ती दल

फोटो ओळ : सातारा जिल्ह्यात श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कोयना परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या अंगणात बसूनच अशा प्रकारे आंदोलन केले.