शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

कास धरण : वाढीव पाणीसाठ्याचे नियोजन यंदाही विस्कटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 17:32 IST

Kas Pathar water shortage Satara: सातारा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाच्या उंचीवाढीच्या कामाला कोरोनामुळे पुन्हा एकदा ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या धास्तीने जवळपास ८० टक्के परप्रांतीय कर्मचारी घराकडे परतले असून, यंदा धरणात वाढीव पाणीसाठा करण्याचे नियोजनही विस्कटले आहे. येत्या आठ दिवसांत धरणाचे काम पूर्णतः थांबणार असून ते पावसाळ्यानंतरच सुरू होईल.

ठळक मुद्देकास धरण : वाढीव पाणीसाठ्याचे नियोजन यंदाही विस्कटले कोरोनामुळे कर्मचारी घराकडे; आणखी आठ दिवस चालणार काम

सातारा : सातारा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाच्या उंचीवाढीच्या कामाला कोरोनामुळे पुन्हा एकदा ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या धास्तीने जवळपास ८० टक्के परप्रांतीय कर्मचारी घराकडे परतले असून, यंदा धरणात वाढीव पाणीसाठा करण्याचे नियोजनही विस्कटले आहे. येत्या आठ दिवसांत धरणाचे काम पूर्णतः थांबणार असून ते पावसाळ्यानंतरच सुरू होईल.सातारा शहराची हद्दवाढ आणि वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर मात करण्यासाठी पालिकेने कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले. जलसंपदा विभागाने एक मार्च २०१८ पासून उंचीवाढीच्या कामास प्रारंभ केला. तीन वर्षांच्या कालावधीत धरणाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले.गतवर्षी निधीचा अडसर निर्माण झाल्याने धरणाचे काम उशिरा सुरू झाले. फेब्रुवारी ते मार्च २०२० या कालावधीत जवळपास दीड महिनाच काम सुरू होते. यानंतर कोरोनामुळे या कामाला ब्रेक लागला. जलसंपदा विभाग व लोकप्रतिनिधींनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून धरणाच्या वाढीव कामास निधी मंजूर झाला आणि डिसेंबर २०२० रोजी धरणाचे काम पुन्हा एकदा सुरू झाले. सलग चार महिने काम गतीने सुरू होते. मात्र पुन्हा एकदा या कामाला कोरोनाने ब्रेक दिला आहे.धरणावरील जवळपास ९० टक्के कर्मचारी हे परप्रांतीय आहेत. कोरोनाच्या धास्तीने अनेक जण घराकडे परतू लागले आहेत. तर उर्वरित कर्मचारी देखील घराकडे जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात धरणाचे काम पूर्णतः बंद होणार आहे. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यातच हे काम पुन्हा सुरू होईल. त्यामुळे कास धरणात यंदा वाढीव पाणीसाठा करण्याचे नियोजन सध्या तरी विस्कळीत झालेले आहे.धरणाचे काम मार्गी लागल्यानंतर आज उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यात तब्बल पाच पटीने वाढ होणार आहे. सातारकरांचा पाणी प्रश्न हा कायमचा मार्गी लागणार आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकल्पाच्या कालावधीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी सातारकरांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रकल्प ९५.७२ कोटींवरकेंद्र शासनाच्या सुजल निर्मल योजनेंतर्गत कास धरण्यासाठी ४२ कोटी ८९ लाख इतक्या रकमेला मार्च २०११ मध्ये राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. कामाचा वाढता कालावधी तसेच नवीन रस्ता, जमिनीचे संपादन यासह इतर कामे वाढल्याने हा प्रकल्प तब्बल ११३ कोटींवर पोहोचला होता. परंतु शासनाने धरणातून इतर कामांना वगळले असून धरणाच्या नवीन ९५ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. रस्ता व इतर कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावली जाणार आहेत.

टॅग्स :Kas Patharकास पठारwater shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर