शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; धरणातील विसर्ग कमी, १२९ कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:01 IST

आठ मंडलांत अतिवृष्टी : नवजा ३८७, महाबळेश्वरला ३०८ मिलिमीटर पाऊस 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी दुपारनंतर कमी झाला. त्यामुळे प्रमुख धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे. तरीही सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे तब्बल ३८७ तर महाबळेश्वरला ३०८ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच आठ महसूल मंडलांतही अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणच्या १२९ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत होता. यामुळे पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बुधवारी सकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. यामुळे कोयना वगळता इतर प्रमुख धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे.तर सायंकाळच्या सुमारास कोयना धरणातून एकूण ९५ हजार ३०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता. धरणाचे दरवाजे १३ फुटांवर स्थिर होते. त्यामधून ९३ हजार २०० आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा विसर्ग सुरू होता. तर कोयनेसह प्रमुख सहा धरणांतून एकूण १ लाख २१ हजार ४११ क्युसेक पाणी सोडले जात होते. यामुळे नद्या दुथडी भरून वाहत होत्या.

सहा धरणांत १४३ टीएमसी पाणीसाठा..कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. धरण क्षेत्रात पाऊस असल्याने सायंकाळच्या सुमारास धरणांमध्ये १४२.८५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ही धरणे ९६ टक्के भरली होती.

पाच तालुक्यांतील रस्ते तात्पुरते बंद..सोमवारपासून मुसळधार पाऊस होत असल्याने मंगळवारपासून अनेक तालुक्यांत काही मार्ग बंद आहेत. यामध्ये पाटण तालुक्यातील चार मार्गांचा समावेश होता. तर महाबळेश्वरसह वाई, सातारा आणि खंडाळा तालुक्यांतील काही मार्ग बंद होते. तर पाटण तालुक्यात २५, कराड ६, महाबळेश्वर ८, वाई ४० आणि सातारा तालुक्यातील ५० कुटुंबांतील ३६१ लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेले आहे.

पसरणी, पाचगणी, तापोळ्याला अतिवृष्टी..बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. सातारा तालुक्यात तासगाव मंडलात ७८, पाटण तालुक्यातील चाफळला ६६, वाई तालुक्यात पसरणी येथे ९५, कोरेगाव तालुक्यात वाठार किरोली ६९, महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर मंडल २७३, तापोळा १०९, पाचगणी ७३ आणि लामजला १७० मिलिमीटर पाऊस नोंद झाला.

कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयना धरणात १०१.४२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ९६.४० टक्के भरले आहे. तसेच सायंकाळी धरणात १ लाख ११ हजार १६६ क्युसेक वेगाने पाणी आवक सुरू होती. तर धरणाचे सहा वक्र दरवाजे १३ फुटांवर असून, त्यातून ९३ हजार २०० आणि पायथा वीजगृह २ हजार १००, असा एकूण ९५ हजार ३०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात होता.