शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मायणीतील गटारीचे काम वर्षापासून अर्धवट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST

मायणी : येथील मुख्य चांदणी चौक व बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूचे गटारीचे काम गेल्या वर्षापासून अर्धवट अवस्थेत ...

मायणी : येथील मुख्य चांदणी चौक व बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूचे गटारीचे काम गेल्या वर्षापासून अर्धवट अवस्थेत असल्याने व्यापारी व वाहनचालकांनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. संबंधित कामावर कोणाचे नियंत्रण आहे, असा सवाल सर्वसामान्य ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.

जानेवारी २०२० रोजी येथील मुख्य चांदणी चौक, मुख्य बाजारपेठ व गावभागातून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. मायणीतून जाणाऱ्या सुमारे दोन किलोमीटर अंतर असलेल्या या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम तीन ते चार महिन्यांत पूर्ण करून देतो, असे आश्वासन ग्रामस्थांना त्या वेळी झालेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आश्वासन ठेकेदारांकडून देण्यात आले होते.

तसेच मुख्य मार्गाच्या कडेला असलेल्या स्वमालकीच्या व रस्त्यामध्ये अडथळा येणारे अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या वेळी तीन-चार महिन्यांत पूर्ण रस्ता होणार, यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी स्वखर्चाने या मार्गावर अडथळा ठरत असलेले अतिक्रमण काढून घेतले. राज्य मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामास त्या वेळी सुरुवात झाली. मात्र विविध कारणांमुळे सतत हे काम रखडले आहे.

या दोन किलोमीटर अंतराच्या दोन्ही बाजूस असलेले गटारीचे काम गेल्या वर्षभरापासून अर्धवट अवस्थेत आहे तर राज्यमार्ग रुंदीकरणाच्या कामातही अनेक वेळा काम बंद राहत आहे. संबंधित ठेकेदारांना याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी विचारणा केली असता प्रत्येक वेळी उडवाउडवीची व चालढकलीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे रखडलेल्या या कामाचा त्रास या मार्गकडेला असलेल्या व्यापाऱ्यांना होत आहे, तर अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत काम असल्याने त्या कडेला पडणाऱ्या खड्ड्यांचा त्रासही वाहनचालकाला होत आहे.

(चौकट)

काम सोयीनुसार चालू, बंद..

मल्हारपेठ-पंढरपूर या राज्यमार्गवरील सातारा जिल्ह्यातील सुमारे वीस किलोमीटर अंतराचे नियंत्रण हे सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून या कामाचा नकाशा सतत बदलत आहे. काम सोयीनुसार चालू, बंद असते, ठेकेदारांकडून ही मनमानी पद्धतीने सर्वेक्षण व काम सुरू आहे. अधिकाऱ्यांचेही या कामावर नियंत्रण आहे का नाही, असा सवाल सर्वसामान्य ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. लाॅकडाऊन असल्यामुळे या कामासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. जे मजूर गटार बांधण्यासाठी आहेत ते लाॅकडाऊनमुळे इतरत्र अडकून पडले आहेत. त्यामुळे हे काम रखडले आहे. दोन-चार दिवसांत कामगार आले की काम सुरू केले जाईल, असे प्रत्येक वेळी सांगितले जाते.

(चौकट )

याच ठिकाणी कामगाराची टंचाई का?

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग कंपनीकडे आहे, याच कंपनीने गेल्या चार दिवसांमध्ये एक विक्रम केला, त्या वेळी

प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्वॉलिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते. एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी एवढ्या संख्येने लोक एकत्र येऊन काम करीत होते. मग याच ठिकाणी का कामगार मिळत नाहीत? असा सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.

०३मायणी

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील मायणी येथील गटारीचे काम गेल्या वर्षभरापासून असे रखडले आहे.(छाया : संदीप कुंभार)