शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

बेघरांना शाळेत घेऊन जाण्यासाठी गुरुजी काढतात स्वत:ची कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 11:25 PM

सचिन काकडेलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने साताºयात दाखल झालेली आणि येथेच रस्त्याच्याकडेला झोपडी टाकून राहणारी कुटुंब सर्वांनीच पाहिली. या कुटुंबात अवखळपणे काळीमिट्टी होऊन खेळणारी मुलं आणि त्यांच्या भवितव्याविषयीची चिंता कधीच कोणालाच पडली नाही. नोकरीच्या निमित्ताने प्रवासादरम्यान एका अवलिया शिक्षकाची नजर त्यांच्यावर पडली आणि ही कळकट्ट कपड्यातली मुलं शालेय गणवेशात ...

सचिन काकडेलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने साताºयात दाखल झालेली आणि येथेच रस्त्याच्याकडेला झोपडी टाकून राहणारी कुटुंब सर्वांनीच पाहिली. या कुटुंबात अवखळपणे काळीमिट्टी होऊन खेळणारी मुलं आणि त्यांच्या भवितव्याविषयीची चिंता कधीच कोणालाच पडली नाही. नोकरीच्या निमित्ताने प्रवासादरम्यान एका अवलिया शिक्षकाची नजर त्यांच्यावर पडली आणि ही कळकट्ट कपड्यातली मुलं शालेय गणवेशात दिसू लागली.या मुलांच्या पालकांची समजूत काढण्यापासून त्यांना आवरून शाळेत पाठविण्यापर्यंतचा प्रवास अवघड असला तरी अशक्य मात्र नक्कीच नव्हता हे ज्ञानेश्वर कांबळे यांनी सिद्ध करून दाखविले.वाठार किरोली येथे राहणारे ज्ञानेश्वर कांबळे नोकरीनिमित्त साताºयात स्थायिक झाले. सध्या ते ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर शाळा क्रमांक दोनमध्ये कार्यरत आहेत. पूर्वी पालिकेच्या सिद्धी विद्यामंदिर शाळा क्रमांक १९ मध्ये ते नोकरी करीत होते. या शाळेत काम करीत असताना ते दररोज वाठार किलोरी ते सातारा ये-जा करीत असत. याचवेळी त्यांना बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात झोपड्या टाकून वास्तव्य करीत असणाºया परप्रांतीय मूर्तीकारांची मुले नजरेस पडली. या मुलांना शिक्षणाचा कोणताही गंध नव्हता. सर्वेक्षणानंतर त्यांना अशी २२ मुले आढळून आली.शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार त्यांनी केला. पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर मुलांचे पलिकेच्या सिद्धी विद्यामंदिरात शिक्षण सुरू झशले. ज्ञानेश्वर कांबळे स्वत: आपल्या गाडीतून विद्यार्थ्यांना शाळेत आणत व पुन्हा घरीही सोडत. मातृभाषा मराठी नसूनही अनेक मुलांना लिहिता, वाचता येऊ लागले.पालिकेच्या ज्ञानवर्धिनी विद्यामंदिरात बदली झाल्यानंतर कांबळे यांनी मे महिन्यात पुन्हा सर्व्हे केला. यावेळी त्यांना मूर्तीकारांची शिक्षणापासून वंचित असलेली २० मुले आढळून आली. या मुलांनाही त्यांनी ज्ञानवर्धिनी विद्यामंदिरात दाखल केले आहे.स्वत:च काढला पासमुलींचा मोफत प्रवास असल्याने उर्वरित आठ विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर कांबळे यांनी स्वखर्चातून एसटीचा पास काढून दिला आहे. मुलांची शिक्षणाप्रती आवड वाढावी व ते दररोज शाळेत यावे हाच या मागचा उद्देश असल्याचे ज्ञानेश्वर कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिक