शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वाढतोय उन्हाळा... स्मार्टफोन सांभाळा ! स्फोट होण्याच्या घटना वाढल्याने खबरदारीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:53 IST

भोलेनाथ केवटे ।सातारा : मोबाईल फोन ही आजच्या काळात सर्वांचीच गरज बनली आहे. प्रत्येकाच्या हातात एक नव्हे तर दोन-दोन स्मार्टफोन पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यातही स्मार्टफोनच्या वापरात प्रचंड वाढ झाली असली तरी नागरिक आजही स्मार्टफोनची योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब भयानक असून, स्मार्टफोनच्या वापरात केलेला निष्काळजीपणा ...

ठळक मुद्देनिष्काळजीपणा ठरतोय धोकादायक

भोलेनाथ केवटे ।सातारा : मोबाईल फोन ही आजच्या काळात सर्वांचीच गरज बनली आहे. प्रत्येकाच्या हातात एक नव्हे तर दोन-दोन स्मार्टफोन पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यातही स्मार्टफोनच्या वापरात प्रचंड वाढ झाली असली तरी नागरिक आजही स्मार्टफोनची योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब भयानक असून, स्मार्टफोनच्या वापरात केलेला निष्काळजीपणा धोकायदायक ठरू शकतो.

पूर्वीच्या काळी घरात एखादा टेलिफोन असायचा. त्याच्यावरच संभाषण चालायचं. काही कालावधीनंतर मोबाईल आला. परंतु त्याचा वापर फक्त फोन उचलणे आणि कट करणे यासाठीच होत होता. कालांतराने मोबाईलमध्ये नवनवीन फिचर्स येऊ लागले. त्यात इंटरनेट, कॅमेरा, गेम्स, व्हिडीओज आदी फिचर्स उपलब्ध झाले. मात्र, नागरिक या स्मार्टफोनचा निष्काळजीपणे वापर करीत असल्याने या निष्काळजीपणामुळेच मोबाईलचा स्फोट होण्यासारख्या घटना घडत आहेत.परभणी येथील एक युवक मोबाईल चार्जिंगला लावून बोलत होता, त्यावेळी स्फोट होऊन त्याच्या हाताची तीन बोटे निकामी झाली होती.

तसेच दोन दिवसांपूर्वी जळगाव येथे खिशात मोबाईलचा स्फोट होऊन एकजण जखमी झाला होता. लखनौमध्येही मोबाईलचा स्फोट होऊन एकजणाचा मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत नसल्या तरी स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी मोबाईलचा ‘स्मार्ट’ वापरही करायला हवा. असे केल्यास संभाव्य धोका टळण्यास मदत होऊ शकते, असे मत व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.चार्जिंग लावल्यावर ‘नो यूज’मोबाईलची बॅटरी ही लिथियम आयर्नपासून बनलेली असते. जी चार्जिंगच्या वेळी गरम होते. मोबाईल चार्जिंग लावल्यावर जर फोनचा वापर होत असेल तर ती आणखीन जास्त गरम होते. त्यामुळे मोबाईल फुटण्याचा धोका अधिकच वाढतो. त्यामुळे चार्जिंग लावल्यावर मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळणे गरजेचे आहे.अशी घ्याल काळजीआपला फोन सतत चार्जिंग करू नकाफोन रात्री चार्जिंगला लावून झोपू नयेमोबाईल चार्ज करताना फोनवर बोलणे, गेम खेळणे, इंटरनेटचा वापर करणे टाळावेफोनवर कोणताही बाह्य दबाव पडणार नाही, याची काळजी घेणेकोणत्याही कारणाने बॅटरी खराब झाल्यास त्याच कंपनीच्या बॅटरीची निवड करादुसºया कोणत्याही कंपनीची बॅटरी घेण्याचा मोह टाळावा.पेट्रोल पंपाजवळ मोबाईलचा वापर टाळावा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMobileमोबाइल