शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

वाढतोय उन्हाळा... स्मार्टफोन सांभाळा ! स्फोट होण्याच्या घटना वाढल्याने खबरदारीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:53 IST

भोलेनाथ केवटे ।सातारा : मोबाईल फोन ही आजच्या काळात सर्वांचीच गरज बनली आहे. प्रत्येकाच्या हातात एक नव्हे तर दोन-दोन स्मार्टफोन पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यातही स्मार्टफोनच्या वापरात प्रचंड वाढ झाली असली तरी नागरिक आजही स्मार्टफोनची योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब भयानक असून, स्मार्टफोनच्या वापरात केलेला निष्काळजीपणा ...

ठळक मुद्देनिष्काळजीपणा ठरतोय धोकादायक

भोलेनाथ केवटे ।सातारा : मोबाईल फोन ही आजच्या काळात सर्वांचीच गरज बनली आहे. प्रत्येकाच्या हातात एक नव्हे तर दोन-दोन स्मार्टफोन पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यातही स्मार्टफोनच्या वापरात प्रचंड वाढ झाली असली तरी नागरिक आजही स्मार्टफोनची योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब भयानक असून, स्मार्टफोनच्या वापरात केलेला निष्काळजीपणा धोकायदायक ठरू शकतो.

पूर्वीच्या काळी घरात एखादा टेलिफोन असायचा. त्याच्यावरच संभाषण चालायचं. काही कालावधीनंतर मोबाईल आला. परंतु त्याचा वापर फक्त फोन उचलणे आणि कट करणे यासाठीच होत होता. कालांतराने मोबाईलमध्ये नवनवीन फिचर्स येऊ लागले. त्यात इंटरनेट, कॅमेरा, गेम्स, व्हिडीओज आदी फिचर्स उपलब्ध झाले. मात्र, नागरिक या स्मार्टफोनचा निष्काळजीपणे वापर करीत असल्याने या निष्काळजीपणामुळेच मोबाईलचा स्फोट होण्यासारख्या घटना घडत आहेत.परभणी येथील एक युवक मोबाईल चार्जिंगला लावून बोलत होता, त्यावेळी स्फोट होऊन त्याच्या हाताची तीन बोटे निकामी झाली होती.

तसेच दोन दिवसांपूर्वी जळगाव येथे खिशात मोबाईलचा स्फोट होऊन एकजण जखमी झाला होता. लखनौमध्येही मोबाईलचा स्फोट होऊन एकजणाचा मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत नसल्या तरी स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी मोबाईलचा ‘स्मार्ट’ वापरही करायला हवा. असे केल्यास संभाव्य धोका टळण्यास मदत होऊ शकते, असे मत व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.चार्जिंग लावल्यावर ‘नो यूज’मोबाईलची बॅटरी ही लिथियम आयर्नपासून बनलेली असते. जी चार्जिंगच्या वेळी गरम होते. मोबाईल चार्जिंग लावल्यावर जर फोनचा वापर होत असेल तर ती आणखीन जास्त गरम होते. त्यामुळे मोबाईल फुटण्याचा धोका अधिकच वाढतो. त्यामुळे चार्जिंग लावल्यावर मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळणे गरजेचे आहे.अशी घ्याल काळजीआपला फोन सतत चार्जिंग करू नकाफोन रात्री चार्जिंगला लावून झोपू नयेमोबाईल चार्ज करताना फोनवर बोलणे, गेम खेळणे, इंटरनेटचा वापर करणे टाळावेफोनवर कोणताही बाह्य दबाव पडणार नाही, याची काळजी घेणेकोणत्याही कारणाने बॅटरी खराब झाल्यास त्याच कंपनीच्या बॅटरीची निवड करादुसºया कोणत्याही कंपनीची बॅटरी घेण्याचा मोह टाळावा.पेट्रोल पंपाजवळ मोबाईलचा वापर टाळावा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMobileमोबाइल