शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

विनामोटार वाढतंय बिल, वीज विभागाचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 2:40 PM

पुरामध्ये वाहून गेलेल्या मोटारीचे बिल शेतकऱ्यांच्या बोकांडी मारण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने केला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या पाणी मोटारी वाहून गेल्या, त्यांना हजारो रुपयांचे बिल पाठविण्यात आलेले आहे. चार हजारांचे बिल हातात पडलेल्या शेतकऱ्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देविनामोटार वाढतंय बिल, वीज विभागाचा अजब कारभारबिल माफ करण्यास टाळाटाळ

सागर गुजरसातारा : पुरामध्ये वाहून गेलेल्या मोटारीचे बिल शेतकऱ्यांच्या बोकांडी मारण्याचा प्रकार वीज वितरण कंपनीने केला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या पाणी मोटारी वाहून गेल्या, त्यांना हजारो रुपयांचे बिल पाठविण्यात आलेले आहे. चार हजारांचे बिल हातात पडलेल्या शेतकऱ्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे.गेल्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्या, ओढ्यांना पूर आला. कोर्टी येथील चंद्रकांत यादव या शेतकऱ्यांची आॅगस्ट २०१९ मध्ये विद्युत मोटार पुरात वाहून गेली. इलेक्ट्रिक मोटार, पाईपलाईन, केबल असे साहित्य वाहून गेल्याने यादव यांचे २४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाले. तिथून पुढे पाऊस सतत सुरू होता. तसेच मोटार वाहून गेल्याने ती चालू ठेवण्याचा प्रश्नच आला नव्हता.तरीही यादव यांना वीज कंपनीने ४ हजार ४१० रुपयांचे बिल धाडले. हे बिल माफ करावे, या मागणीसाठी यादव वीज कंपनीत हेलपाटे मारत असून, त्यांची कोणीच दखल घेत नाही, ही स्थिती आहे.

दरम्यान, जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांचा कालावधी हा पावसाळ्याचा असतो. याच पावसाळ्याच्या कालावधीमधील मोटार वापरल्याचे तब्बल ८ हजार २४० रुपयांचे बिल चंद्रकांत यादव यांना पाठविण्यात आले होते. ते बिल यादव यांनी भरले.त्यानंतर पुरात मोटार वाहून जाऊनही वीज विभागाने त्यांना विजेचे बिल पाठवले. वास्तविक, मोटार अस्तित्वातच नसेल तर कसे काय बिल पाठविले गेले, वीज विभाग हे काम अंदाजपंचे करत आहे का? अशी शंका जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत. त्यामुळे योग्य ते बील आकारावे, अशी मागणी होत आहे.कऱ्हाड तालुक्यातील कोर्टी, भोसलेवाडी या गावांतील नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाण्याच्या मोटारी सर्रासपणे वाहून गेल्या. या भागातील १३ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तरीदेखील वीज कंपनीने शेतकऱ्यांना वीज बिले धाडली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातून कसेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू असताना हे बील जास्त आहे.

यंदा मोठा पाऊस झाला. खरीप हंगामात शेती पिके भिजविण्याची गरज पडली नव्हती, तरीही आॅगस्ट महिन्यात आलेले ८ हजार २४० रुपयांचे बिल मी भरले. मात्र, मोटार वाहून गेली तरीही मला बिलाचा भुर्दंड बसला आहे. वीज कंपनीने हे बिल माफ केलेले नाही.- चंद्रकांत यादव, शेतकरी

अतिवृष्टीच्या काळात शेतीपंपासाठी वीज वापर झालेला नाही. तरीही वीज बिले दिली गेलेली आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. वीज कंपनी अंदाजे बिले देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शासनाने अतिवृष्टीच्या काळातील कृषी पंपाची बिले सर्रास माफ करावीत.- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीmahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर