शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षे दुष्काळ...आता आमिषांचा पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षे वॉर्डात फिरायला विसरलेल्या उमेदवार व त्यांच्या नेत्यांना आता पुन्हा मतदारराजाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षे वॉर्डात फिरायला विसरलेल्या उमेदवार व त्यांच्या नेत्यांना आता पुन्हा मतदारराजाची आठवण झालेली आहे. मतदारांच्या दृष्टीने पाच वर्षे दुष्काळ होता. आता प्रत्येक नेता आमिषांचा पाऊस पाडत असल्याचे चित्र निवडणूक लागलेल्या गावागावांत पहायला मिळत आहे. उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यातील ६५४ गावांमध्ये आता प्रत्यक्षपणे मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. अनेक गावांमध्ये तिरंगी लढती होत आहेत. वेगवेगळ्या गटाचे उमेदवार दिवसातून अनेकदा मतदारांच्या घराचे उंबरे झिजवत आहेत. कुठली भावकी कुणासोबत याचे अंदाज बांधले जात असून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्रचार फेऱ्या सुरू होत्या. ज्या मतदानाची खात्री वाटत नाही, तिथे वारंवार जाऊन सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी दबावाचे राजकारण खेळले जात आहे.

काही गावांत मतदार तणावाखाली आहेत. प्रशासनाने या संवेदनशील गावांमध्ये जाऊन पाहणी करण्याची गरज आहे.

बुधवारी सायंकाळी साडेपाचनंतर जाहीर प्रचार करता येणार नसल्याने उमेदवार आणि त्यांचे पॅनलप्रमुख रात्री उशिरापर्यंत वॉच ठेवून आहेत. सहकारी संस्थेत नोकरीला लावण्याचे आश्वासन अनेकांना दिले गेले असल्याने आता नेतेमंडळी किती लोकांना सहकारी संस्थेत नोकरी देणार हा प्रश्न निवडणुकीनंतर उभा राहू शकतो.

अनेक गावांत विकासकामांच्या मुद्द्यांवर प्रचार होताना दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधक देखील सोयीचे राजकारण करत असल्याने वास्तविक विकासाचे मुद्दे बाजूला पडले आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये तर पूर्वी केलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर काढण्यात आलेले आहेत. ऐन निवडणुकीत भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागल्याने उमेदवार व पॅनल प्रमुखांची गोची होऊ लागलेली दिसते. अनेक गावांत आमदार व त्यांच्याविरोधात विधानसभा लढलेल्या उमेदवारांनी लक्ष घातले आहे. या निवडणुकीतून पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व पुढे येणार असल्याने काहींनी मोर्चेबांधणी हाती घेतलेली आहे, अशा परिस्थितीत मतदारांच्या डोक्यात मात्र गोंधळ दिसून येतो. भावकी, व्यक्तिगत संबंध या आधारावरच मतदार मतदान करणार असल्याचे दिसते.

निवडणूक लागलेल्या एकूण ग्रामपंचायती : ८७८

सदस्य संख्या : ७२६६

प्रभाग संख्या : २८१३

पूर्णत: बिनविरोध ग्रामपंचायती : १२३

अंशत: बिनविरोध ग्रामपंचायती : ९८

बिनविरोध सदस्य : २६३१

निवडणूक लढविणारे उमेदवार : ९५२१

जाहीर प्रचार आज थांबणार

निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार मतदान थांबण्याच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबविण्यात येणार आहे. त्यानुसार बुधवार, दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार थांबेल. त्यानंतर मतदारांवर वैयक्तिक दबाव तसेच आमिषे दाखविण्याचे प्रकार वाढणार असल्याने प्रशासनाला जास्त दक्ष राहावे लागणार आहे.