शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

आधी सुईचे चटके.. .. मग अंगाला हळद ! नवरदेवाची परंपरा: जबाबदारीची जाणीव करून देणारा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:46 IST

सातारा : लग्न समारंभ म्हणजे दोन जीवांमध्ये आणि दोन कुटुंबांमध्ये जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारा एक अविस्मरणीय सोहळा. हा सोहळा पार पडण्यापूर्वी विविध जाती-धर्मात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा

भोलेनाथ केवटे ।सातारा : लग्न समारंभ म्हणजे दोन जीवांमध्ये आणि दोन कुटुंबांमध्ये जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारा एक अविस्मरणीय सोहळा. हा सोहळा पार पडण्यापूर्वी विविध जाती-धर्मात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आजही पाळल्या जातात. साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या एका विवाहसोळ्यात नवरदेवाच्या हातावर आधी सुईचे चटके मग हळद लावण्यात येते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आजही सुरू आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण टप्पा असणारा हा क्षण आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. तसेच काहीजण आपली जुनी परंपरा आहे तशीच टिकवून ठेवतात तर दुसरीकडे आता बदलत्या काळानुरूप अशी काही मंडळीही दिसत आहेत.

सातारा जिल्ह्यात असेही काही समाजबांधव आहेत जे आपली जुनी परंपरा चालू ठेवत आहेत. अशाच एका समाजात लग्न समारंभात नवरदेवाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी त्याच्या हाताला सुईने चटके देण्याची परंपरा आजही टिकून आहे.त्यांचं असं म्हणणं आहे की, मुलगा आतापर्यंत कुमार वयात होता. आता तो प्रौढवयात आला आहे. त्याला जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे, याची त्याला आठवण करून देण्यासाठी लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला चटके हाताला देतात.

नवरदेवासाठी गूळ आणि चपातीचे मिश्रण करून त्याचे पाच ते सात गोळे तयार केले जातात. घरी देवाची पूजा केली जाते. तसेच ज्वारीच्या कांडकीमध्ये एक सुई ठेवली जाते. दिव्यात ती सुई गरम करून लालबुंद केली जाते आणि त्याचे सात चटके नवरदेवाच्या हाताला सर्वांच्या साक्षीने दिले जातात आणि चटका दिल्यावर त्रास होऊ नये म्हणून त्याला गुळाचा आणि चपातीचे मिश्रण केलेला एकेक गोळा खाण्यासाठी देतात.राग निवळण्यासाठी चपाती अन् गूळनवरदेवाला गरम सुईचे चटके देताना त्याला राग येतो, त्यामुळे त्याला राग येऊ नये आणि त्याचा निवळण्यासाठी त्याला चपाती व गूळ खाण्यासाठी देतात. तात्पुरता राग शांत झाला तरी ही आठवण कायमस्वरुपी त्याच्या स्मरणात राहील.नवरदेवाच्या लहान भावालाही चटकेनवरदेवाला सुई गरम करून चटके देताना त्याला लहान भाऊ असेल तर त्यालासुद्धा हे पाच ते सात गरम सुईचे चटके दिले जातात. त्याच्या लग्नावेळी हे चटके नाही दिले तरी चालतात.या गरम सुईचे चटके फक्त नवरदेवालाच आणि त्याला लहान भाऊ असेल तर त्याला देण्यात येतात. नवरीला अशाप्रकारचे चटके देत नाहीत. 

आमची ही परंपरा फार पूर्वीपासून चालून आलेली आहे. आजही आम्ही ती चालूच ठेवली आहे. नवरदेवाला आता जबाबदारीची जाणीव करून चटके देण्याची ही प्रथा चालू आहे. काळानुरूप बदलायला हवे. मात्र, आपल्या जुन्या चालत आलेल्या परंपराही जतन केल्या पाहिजेत.-संजय राठोड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्न