शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

उडी मारून अभियंत्याची आत्महत्या

By admin | Updated: March 11, 2017 22:31 IST

मध्यवर्ती बसस्थानकाजवळील घटना : इमारतीच्या सुमारे शंभर फुटांवरुन स्वत:ला दिले झोकून

सातारा : बसस्थानकाशेजारील एका इमारतीवरून उडी टाकून संतोष गोपाळ कांबळे (वय ३९, रा. सिद्धार्थनगर करमाळा, जि. सोलापूर) या अभियंत्याने शनिवारी सकाळी सात वाजता आत्महत्या केली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली असून, बेरोजगाराला कंटाळून त्यांनी हे कृत केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.‘मला नोकरी लागली आहे,’ असे सांगून संतोष कांबळे हे गेल्या चार दिवसांपूर्वी घरातून निघून आले होते. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास ते बसस्थानक परिसरातून फिरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले असल्याचे समोर आले आहे. बसस्थानकातून ते चालत पोवई नाका येथे गेले. त्यानंतर पुन्हा परत ते बसस्थानकाकडे आले. बसस्थानकाशेजारी इमारतीसमोर एका दुकानाचे उद्घाटन होते. या ठिकाणी ते काहीवेळ थांबले. त्यानंतर जिन्यावरून इमारतीवर गेले. टेरेसच्या कडठ्यावर उभे राहून त्यांनी तेथून उडी मारली. ज्या ठिकाणी दुकानाच्या उद्घाटनाची लगबग सुरू होती. नेमकी त्याच ठिकाणी त्यांनी उडी मारली. मोठा आवाज आल्याने रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांनी धाव घेतली. संतोष कांबळे यांच्या कानातून आणि डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. काही नागरिकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत नागरिकांनी संतोष कांबळे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुणे येथे हलविण्यात आले. दुपारी बारा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पोलिसांनी त्यांचे खिसे तपासले असता त्यांच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी ‘मी वेडा आहे. म्हणून मी आत्महत्या करत आहे,’ असा उल्लेख आहे. मात्र, त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली आहे. संतोष कांबळे यांनी मॅकॅनिकल इंजिअनरची पदवी घेतली होती. काही वर्षे त्यांनी काम केले. मात्र, नंतर ते घरीच होते. नोकरीच्या शोधात इतरत्र ते फिरत होते. घरातून जातानाही त्यांनी मला नोकरी लागल्याचे सांगितले होते. हाताचा पंजा उमटला !संतोष कांबळे यांनी इमारतीवरून उडी टाकल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या हाताचे ठसे उमटले असल्याचे दिसून येत आहे. तेथून पुन्हा ते सुमारे शंभर फुटांवरून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखम झाली.५आत्महत्या करण्यापूर्वी गावकऱ्यांना फोन !संतोष कांबळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी करमाळा येथील आपल्या गावकऱ्यांना फोन केल्याचे पुढे आले आहे. ‘मी एक-दोन दिवसांत गावी येणार आहे,’ असे त्यांनी सांगितले होते. मात्र, अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.