शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेल स्थिर; कांद्याचा भाव १०० रुपयांनी उतरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST

सातारा : मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर स्थिर असून कांद्याचा भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी उतरला आहे. तर इतर भाज्या ...

सातारा : मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर स्थिर असून कांद्याचा भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी उतरला आहे. तर इतर भाज्या स्वस्त असतानाच वाटाण्याला क्विंटलला ६ हजारापर्यंत दर मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी बाजार समितीत ४३१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर कांद्याची १३५ क्विंटलची आवक राहिली. कांद्याला क्विंटलला १०० पासून १९००पर्यंत दर मिळाला. तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ६० ते ७० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला १५० ते २०० रुपये भाव आला. आल्याला क्विंटलला २ हजारांपर्यंत तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून आले आणि लसणाचा दर स्थिर असल्याचे दिसून आले. तर वाटाण्याचा भाव वाढत आहे. रविवारी क्विंटलला ५ ते ६ हजारापर्यंत दर मिळाला.

खाद्यतेल बाजारभाव...

सध्या तरी खाद्यतेलाचा दर स्थिर आहे. पण, काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे दर उतरण्याची शक्यता आहे. साताऱ्यात सूर्यफूल व शेंगदाणा तेल डबा २४०० ते २४५० रुपयांना मिळत आहे. तर सोयाबीनचा २४०० व पामतेलचा २१०० रुपयांना मिळत आहे. पाऊचचा दरही स्थिर आहे.

डाळिंबाची आवक...

बाजार समितीत सध्या डाळिंब, सफरचंद, सीताफळ आणि संत्र्याची आवक होत आहे. रविवारी सफरचंदाची ४० तर डाळिंबाची १० क्विंटलची आवक झाली.

शेवगा दरात सुधारणा...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर कमी झालेत. कोबी आणि बटाट्याला भाव कमी आहे. कोबीला १० किलोला ६० ते ८०, बटाट्याला १२० ते १४० रुपये भाव आला. भेंडीला १०० ते १५०, शेवगा शेंग ४०० ते ५००, गवारला १०० ते १२० रुपये दर आला. गवारचा दर कमी तर शेवग्याचा वाढला आहे.

प्रतिक्रिया...

खाद्यतेलाचा दर स्थिर आहे. पण, केंद्र शासनाने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत खाद्यतेलाचा दर थोडा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

मागील काही काही दिवसांत भाज्यांचा भाव कमी-जास्त होत आहे. तरीही कोणतीही भाजी ही ४० रुपयांच्या खाली नाही. काही भाज्यांना तर किलोला ८० रुपये मोजावे लागतात. मेथी, शेपू पेंडी १० रुपयांपुढे मिळत आहे.

- कविता काळे, ग्राहक

बाजार समितीत शेतमाल नेल्यास दर कमी मिळतो. त्यातच आता कांद्याचा दरही कमी झाल्याने खर्च निघणेही अवघड झालेले आहे. वांगी, कोबी आणि फ्लॉवरला दर कमीच मिळतोय. सध्या वाटाण्याला तेवढा चांगला दर मिळत आहे.

- रामराव पवार, शेतकरी

..........................................................................................................................................................................................